प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कडक निर्बंधांची अंमलबजावणी करूनही कोरोना रूग्णांची वाढती संख्या रोखण्यात अपयश येत आह़े शुक्रवारी नव्याने तब्बल 513 नवे रूग्ण आढळून आले आहेत़ यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 18 हजार 46 पर्यंत पोहोचली आह़े
जिल्हा रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात आरटीपीसीआर टेस्टमध्ये 169 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये केवळ 344 असे एकूण 513 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आल़ी वाढत्या रूग्णसंख्येमुळे जिह्यातील आरोग्य यंत्रणेपुढे ताण वाढताना दिसून येत आह़े मागील 20 दिवसांत 100 हून अधिक रूग्णांचा मृत्यू झाला आह़े यामध्ये वयोवृद्ध रूग्णांची संख्या अधिक होत़ी मात्र त्याचबरोबर तरूण रूग्णांचा देखील मृत्यू होत असल्याचे दिसून येत आह़े
घरीच सुरक्षित रहा!
रत्नागिरी जिह्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर टेस्टींग देखील वाढवण्यात आली आह़े मात्र रूग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने जिह्यात ऑक्सिजन बेडची संख्या कमी पडत आह़े रूग्णवाढ कमी आली नाहीतर मोठे संकट जिह्यासमोर उभे राहू शकत़े याची दखल घेवून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सर्व नागरिकांनी अनावश्यकरित्या फिरू नय़े घरीच सुरक्षित रहा, असा संदेश दिला आह़े