प्रतिनिधी/ रत्नागिरी
शेती मशागतीचे काम आटपून तयारीत असलेल्या बळीराजाला आता पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आह़े काही ठिकाणी शेतकऱयांनी धुळपेरणी केली असून चिमण्या दाणे खावून नुकसान होण्याची शक्यता आह़े दरम्यान पाऊस पुढील काही दिवसात जिह्यात प्रवेश करणार असल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले आह़े
रत्नागिरी जिह्याचा विचार करता या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर भातशेती करण्यात येत़े यासाठी चांगला पाऊस होणे अत्यंत गरजेचे आह़े वेळेवर पेरणीची कामे झाली तर पुढील दिवसांचे नियोजन शेतकऱयाला करता येत़े तसेच लावणीची कामेही वेळेत उरकून घेता येतात़ मात्र पावसाने उसंत घेतल्यास पुढील सर्व शेतकऱयाचे गणित बिघडून जात असत़े आता जूनचा पहिला आठवडा उलटून गेला असला तरी पावसाचा जोर दिसून आलेला नाह़ी तसेच मागील काही दिवसांपासून तीव्र उकाडा जिह्याला जाणवू लागला आह़े मान्सून वाऱयांचे आगमन झाल्यास उकाडय़ापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत़ त्याचप्रमाणे काही भागात पाण्याची टंचाईही जाणवत आह़े रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱया शीळ धरणाचा पाणीसाठाही घटला आह़े यामुळे शहराला पाणीटंचाईला समोर जावे लागले आह़े काही दिवसांपूर्वी शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करणार असल्याचे नगर परिषदेकडून जाहीर करण्यात आले होत़े
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये दाखल झाला आह़े 8 जूनपर्यंत तो तळकोकणात दाखल होण्याची शक्यता आह़े मागीलवर्षी मोठय़ा प्रमाणावर पडलेल्या पावसाचा फटका रत्नागिरी जिह्याला बसला होत़ा यावर्षी सुमारे 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आह़े