‘तरुण भारत’ इम्पॅक्ट
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिह्यात गेल्या तीन महिन्यांपासून युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झाले होते. युरियाची टंचाई आणि शतकऱयांची हतबलता याबाबत ‘तरुण भारत’ ने 15 जून रोजी ‘चारशे रूपये देतो, पण युरिया द्या’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची त्वरीत दखल घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे व जि.प.चे कृषि अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी तालुक्यातील कृषी अधिकार्यांची बैठक घेऊन जिह्यातील कृषि सेवा केंद्रांसह मिश्र खत उत्पादक संघांची तपासणी करून युरियाचा साठा तपासण्याचे आदेश दिले. तसेच युरिया मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी सबंधित कंपन्यांना जिह्यात तातडीने युरिया देण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार बुधवारी इफको कंपनीने 2000 तर आयपीएल कंपनीने 1300 मेट्रिक टन युरियाचा जिह्यात पुरवठा केला असून गुरुवारी आरसीएफ कंपनीकडून 2600 मे. टन युरियाचा पुरवठा केला जाणार आहे. ‘तरुण भारत’ च्या पाठपुराव्यामुळे
जिह्यात मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध झाला असून शेतकर्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
जिह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये युरिया खताची टंचाई असल्याबाबत शेतकर्यांच्या तक्रारी होत्या. अनेक शेतकर्यांकडून 266 रूपयांची गोणी 400 रूपयेला द्या, पण युरिया द्या अशी मागणी केली जात असल्याच्या घटनाही समोर आल्या. याबाबत ‘तरुण भारत’ने जिह्यातील युरिया टंचाईवर प्रकाशझोत टाकला. या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी सोमवारी दुपारी जि.प.चे कृषि अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह तालुका कृषि अधिकार्यांची बैठक घेतली. 16 ते 17 जून या दोन दिवसात जिह्यातील मिश्र खत उत्पादकांसह सर्व कृषि सेवा केंद्रांची चौकशी करण्याचे आदेश वाकुरे यांनी दिले. यामध्ये 1 मार्च ते 15 जूनअखेर युरियाची खरेदी किती केली, विक्री किती झाली, शिल्लक साठा आहे काय? याची चौकशी करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पंचायत समित्यांचे कृषि अधिकारी, मोहिम अधिकारी, तालुका कृषि अधिकार्यांकडून चौकशी सुरु झाली आहे.
दोन दिवसात 6000 हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध होणार
युरिया खताची टंचाई असल्यामुळे कृषि विभागाने केलेल्या मागणीनुसार बुधवारी इफको कंपनीचा 3300 तर आयपीएल कंपनीचा 1300 मे.टन युरिया उपलब्ध झाला आहे. येत्या दोन दिवसात आरसीएफ कंपनीचा 2600 मे.टन युरिया जिह्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱयांना खरिप हंगामासाठी युरिया खताची टंचाई भासणार नाही. शेतकऱयांनी केवळ युरिया खताचा जास्त वापर न करता इतर संयुक्त खतेही वापरावीत असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले.