सहालाखांहूनअधिकनागरिकांनालस
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात आतापर्यंत 6 लाख 24 हजार 429 जणांचे लसीकरण करण्यात आले आह़े यापैकी 4 लाख 42 हजार 804 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 81 हजार 625 जणांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. जिह्यात सुमारे 52 टक्के लसीकरण झाले आह़े मात्र लसीकरण वेग मंदगतीने होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी लसीकरणाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आल़ी त्यानुसार जिह्यामध्ये 83 टक्के हेल्थ केअर वर्करचे पहिल्या डोसचे तर 63 टक्के हेल्थ केअर वर्करचे दुसऱया डोसचे लसीकरण करण्यात आले आह़े 18 हजार 52 जणांनी कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस तर 13 हजार 695 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. जिह्यात 38 हजार 330 प्रंटलाईन वर्कर्सनी कोरोनाचा पहिला व 26 हजार 512 जणांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत़ 18 ते 45 वयोगटातील 1 लाख 38 हजार 186 जणांनी कोरोनाचा पहिला तर 32 हजार 919 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत़ 45 ते 60 वयोगटातील 1 लाख 32 हजार 946 जणांनी पहिला व 55 हजार 101 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्यांमध्ये 1 लाख 15 हजार 290 जणांनी एक तर 53 हजार 398 जणांनी दोन्ही डोस पूर्ण केल्याची माहिती डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली.