वाढत्या रूग्णसंख्येमुळे चिंता वाढली
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात मागील 24 तासामध्ये जिह्यात 508 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर रविवारी 14 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आठवडाभरानंतर परत 500 च्या वर रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागासमोरील चिंता अधिकच वाढली आहे. जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्याही 36 हजाराच्या वर गेली आहे.
नव्याने सापडलेल्या 508 रुणांपैकी 296 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 212 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 508 नव्या रुग्ण सापडल्याने जिह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढून 36 हजार 044 झाली आहे. जिह्यात सोमवारी 393, मंगळवारी 315, बुधवारी 635, गुरुवारी 437, शुक्रवारी 416 तर शनिवारी 494 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते.
जिल्हय़ात 3547 ऍक्टिव्ह रूग्ण जिल्हय़ात रविवारी 378 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 31,280 झाली आहे. तसेच जिल्हय़ातील ऍक्टिव्ह रूग्णसंख्या 3547 इतकी आहे. तर कोरोना बळींची एकूण संख्या 1217 वर गेली आहे. जिह्यातील पॉझिटिव्हीटी रेट 17.67 इतका असल्याचे सूत्रांनी सांगितले.