शिक्षकांना गांभीर्याने कामाला लागण्याच्या सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव तालुक्मयातील अनेक शाळा स्मार्ट करण्यात आल्या आहेत. मात्र तेथील परिस्थिती सुधारली आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी जिल्हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. व तालुका पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी अचानक भेटी देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. यावेळी तालुका गटशिक्षणाधिकारी जुट्टण्णावर यांना चांगलेच खडसावण्यात आले.
कोणतीही शाळा बाहेरून स्मार्ट नको तर आतून स्मार्ट हवी. त्यासाठी शिक्षण खात्याने आणि शिक्षकांनी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे शिक्षकांनी मनापासून कामाला लागणे आणि खऱया अर्थाने शाळा स्मार्ट करणे, ही काळाची गरज आहे. त्यामुळे यापुढे शाळांना स्मार्ट बनविण्यासाठी शिक्षण खाते आणि शाळांतील शिक्षकांनी कसोशीने व जागृत राहून विद्यार्थ्यांना घडविणे गरजेचे आहे. त्यामुळे गांभीर्याने कामाला लागला, असा सल्ला यावेळी देण्यात आला.
दरम्यान स्मार्ट शाळा म्हणून कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुदुक, आंबेवाडी शाळांना भेटी देण्यात आल्या. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनीही याबाबत अनेक सल्ले दिले. कोणत्याही परिस्थिती सरकारी शाळा टिकविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी जोरदार प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.