कोरोनाच्या काळात जीएमओ पिकांवरचे संशोधन स्थगित राहिले नाही. जैवतंत्रज्ञानातील अनेक प्रयोग सातत्याने चालू आहेत. त्यातील जेन एडिटिंगचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यासाठी कॅस्पर कॅस तंत्रज्ञान खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. एखाद्या पिकातील नको असलेला जनुकीय अंश काढून हवा असलेला दुसऱया पिकातील अथवा इतर सजीवातील जनुके स्थलांतरित करून नव्या वाणांची निर्मिती होऊ शकते. पशूधनातील जैविक तंत्रज्ञान आणि विज्ञान खूप झपाटय़ाने विस्तारत आहे. संपर्क ज्ञान व दूरसंचार तंत्रज्ञानामुळे विकसित झालेले जैविक तंत्रज्ञान लोकापर्यंत पोहोचतात. आफ्रिका, लॅटिन अमेरिका व अरब राष्ट्रांमध्ये जीएमओ तंत्रज्ञान खूप वेगाने विस्तारत आहे. भविष्यातील अन्न व ऊर्जा जीएमओ तंत्राने विकसित होणार आहेत.
1996 साली जीएमओ पिके लागवडीसाठी उपलब्ध झाली. त्यानंतरच्या तीन दशकांमध्ये हे तंत्रज्ञान जगभर विस्तारत आहे. विशेषतः विकसनशील देशांमध्ये हे तंत्रज्ञान लोकप्रिय होत आहे. कृषी-जैव-विज्ञानामुळे रोज नवनवीन पिके अस्तित्वात येत आहेत. इसाआ (आयएसएएए) या संस्थेमधील जैवपिकांच्या संदर्भातील माहिती जगभर उपलब्ध करून दिली जाते. अनेक राष्ट्रे जैवपिकांना मंजुरी, स्वीकृती आणि प्रसार ही त्रिसूत्री स्वीकारून त्याचा विस्तार करीत आहेत. विशेषतः ‘बिग फोर’ म्हणून ओळखली जाणारी जीएम पिके, सोयाबीन, मक्का, कापूस आणि मोहरी खूप लोकप्रिय आहेत. अलीकडे व्हिएतनाम, फिलिपाईन्स, कोलंबिया देशातील जीएम पिकांचे क्षेत्र दुप्पट झाले आहे.
सुमारे 10,000 वर्षापूर्वी नैऋत्य आशियामध्ये प्रथमतः पिकांच्या नव्या वाणांची निर्मिती झाली असे सांगितले जाते. तेव्हापासून सातत्याने कृषीवर प्रयोग चालू आहेत. विशेषतः गेल्या 30 वर्षांमध्ये जीएम पिकांनी क्रांतीच केलेली आहे. जीएम बियाणांची बाजारपेठ वार्षिक 9.83… ते 10… च्या दरम्यान वृद्धिंगत होत आहे. जीएम अन्नधान्याची आयात-निर्यात वाढत आहे. कृषी-उद्योगाच्या संबंध व्यवहार सुमारे 3.2 ट्रिलियन युएस डॉलर्स इतके आहे. रोजगारदेखील मोठय़ा प्रमाणात गुंतलेला आहे. वाढत्या लोकसंख्येला पोसण्याचे सामर्थ्य केवळ जैव तंत्रज्ञानातच आहे. शेती क्षेत्रावर पडणाऱया अनेक रोगांवर इलाज करण्यासाठी 290 दशलक्ष युएस डॉलर किमतीची औषधे दरवर्षी वायरली जातात. जीएम पिकामुळे बऱयाच रोगावर मात करता येते. औषध फवारणीमुळे पर्यावरणीय ऱहास नियंत्रणास ठेवता येतो. भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्टॅडिंग कमिटीने जीएम पिकांचा स्वीकार करण्यापूर्वी त्याचा काटेकोर अभ्यास केला जावा, असे सूचित केल्यामुळे कापूस वगळता इतर पिकांना जीएमओ तंत्रज्ञान मंजूर नाही. मोहरी, वांगी पिकांचा विचार चालू आहे. पण अद्याप त्याना मंजुरी मिळाली नाही. काही आंतरराष्ट्रीय अभ्यासाद्वारे असे सिद्ध झाले आहे (बोस्टन कॉन्फरन्स 1916) की, जीएमओ पिकांना 0.27 ते 2.2…ची किमत वाढ मिळाली. जीएमओवरील बंदीमुळे सर्वसाधारण कल्याणकारी घटकांचे 9.75 अब्ज डॉलरचे नुकसान झाले. तसेच जीएम पिकांमुळे पर्यावरणीय नुकसान कमी होते. सध्या अत्यंत विषारी व हरित वायू निर्माण करणाऱया औषधांचा वापर वाढला आहे. पिकावर फवारल्या जाणाऱया औषधांचे अंश मानवी शरीरात सहज प्रवेश करतात. त्यांची फार मोठी गुंतागुंत निर्माण होते. विशेषतः रोग प्रतिकारक शक्ति कमी होते. जीएमओच्या पिकामुळे रासायनिक शेती नष्ट होईल. जीएमओच्या तणनाशकामुळे जमिनीतील सजीवसृष्टी नष्ट होत आहे. जीवाणू संवर्धन महत्त्वाचे बनले आहे. म्हणून युरोपमधील जीएमओ पिकांची स्वीकार्यता 42…नी वाढली आहे. आशियामध्ये हे प्रमाण 16… आहे. गोल्डन राईसमध्ये अ जीवनसत्त्व अधिक असल्यामुळे त्याची मागणी वाढली आहे. अमेरिकेमध्ये 189 जीएमओ वाणांची निर्मिती झालेली आहे. भारतातील कापसाच्या आठ पिढय़ातील जाती विकसित आहेत. जीएम पिकांची आणि बिगर जीएमओ पिकांच्या उत्पादकतेमध्ये खूपच तफावत आढळते. साधारणतः 35 ते 36…नी जीएम पिकांची उत्पादकता अधिक असते. काही जीएम पिकांची उत्पादकता 45 ते 48…पेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.
गेल्या 20 वर्षांमध्ये 12 दशलक्ष वाहनांनी जे कार्बन उत्सर्जित केले असते तेवढे कार्बन उत्सर्जन जीएम तंत्रज्ञानामुळे कमी झाले आहे. दुष्काळ, वादळ, अतिवृष्टी, महापूर, रोगराई, विनाशी हवामान बदल हे कार्बनमुळे होत असतात. जीएम पिके घेतल्यामुळे गेल्या 20 वर्षामध्ये जगातील 619 दशलक्ष कि.लि. औषध फवारणी कमी झाली आहे. जीएम पिकामुळे अमेरिकेतील सुमारे 11… जंगल व पडजमीन लागवडीखाली येऊ शकलेली नाही. ब्राझिलमध्ये 31… अशी जमीन वाचली आहे. चीनमध्ये 13… जमीन संरक्षित रहिली आहे.
ब्राझिलच्या शुगरकेन ब्रिडिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी कंपनीने बी. टी. उसाची जात शोधून काढली आहे. सीटीसी 20 बी. टी. या नावाने ती जात प्रसिद्ध आहे. यामध्ये खोड कीडवर कायमचा उपाय निर्माण झाला आहे. उसाच्या कांडीमध्ये खोड किड निर्माण झाल्यास नुकसान होते. भारतासारख्या देशामध्ये हुयणी, तांबेरा, उसाला कोंब फुटले या प्रक्रिया जीएम तंत्रज्ञानाने बंद होऊ शकतात. शुगर उत्पादनासाठी शुगरकेन आहे, तसे इथेनॉलच्या, इएनए, आरएस यासारख्या ऊर्जा निर्माण करण्यासाठी ‘एनर्जी केन’ ची आता गरज निर्माण झाली आहे. शेतकरी शुगर केन पिकवायचे की एनर्जी केन पिकवायचे हे ठरवू शकतो. एनर्जी केनमुळे बायोगॅस, प्लास्टिक व वीज उत्पादन होऊ शकते. जीएम तंत्रज्ञानाच्या वापराला खूप संधी आहे. याचा लाभ ऊसकरी शेतकऱयांना होईल. जीएम पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता सुधारत असल्यामुळे त्या पिकांच्या अन्नधान्य, फळे, भाजीपाल्याची आयात-निर्यात व्यापार वाढत आहे. 2013-14 मध्ये एकटय़ा जीएम सोयाबिनच्या एकूण उत्पादनाच्या 40… सोयाबीनची निर्यात झाली. सोयाबीनमध्ये सोयाबीनचा वापर 87… आहे. त्यापासून बनविले जाणारे पदार्थ भारतात येतात. असे अनेक अन्नघटक भारतामध्ये विकले जातात. जीएम तंत्रज्ञानाला मात्र भारतात विरोध आहे. मोहरीच्या एकूण उत्पादनापैकी 21… हिस्सा निर्यात व्यापारासाठी वापरला आहे. मोहरी तेलाचा वापर असलेले अनेक पदार्थ जगभर विकले जातात. तसेच जीएम मक्क्यापासून तयार केलेले अनेक अन्न घटक भारतात देखील विकले जात आहेत. विशेषतः सोया, मका, मोहरी, सरकी तेल यांचे मिश्रण असलेले अनेक बेबी फूडचे घटक भारतात विकले जातात. एकूण 39 फूड पॅकमध्ये जीएम अंश असल्याचे सीएसई, दिल्ली यांच्या निदर्शनास आले आहे. सुमारे 21 पैकी 10 विदेशी कंपन्यांच्या अन्नपदार्थामध्ये जीएमचे अंश होते. त्यामध्ये केल्लाग्ग प्रुट, लुप्स सेरियल, अमेरिकन गार्डन पॉप कॉर्न, मिसेस कुब्बिकन्स क्राऊटन्स टोस्ट बेड, ट्रिक्स कॉर्न पप्स, मोरी नु टुप्रु, बगल्स कॉर्न स्नॅक्स अँड कारो, सायरप अशा काही अन्नपदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे जीएमओ संशोधनास प्राधान्य देणे आवश्यक आहे.
डॉ. वसंतराव जुगळे ः9422040684