नवी दिल्ली
जीएसटी करदात्यांना आता यापुढे रिटर्न फाईल करताना उशीर झाल्यास फारसा दंड भरावा लागणार नाही. सरकारने यासंदर्भात जीएसटी करदात्यांना दिलासा देताना दंडाची रक्कम नाममात्र 500 रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. करदात्यांना तिमाहीत किंवा महिना संपल्यानंतर पुढच्या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत रिटर्न फाईल करायची गरज असते. यात जर का उशीर झाल्यास प्रत्येक रिटर्न फाईलमागे 500 रुपये दंड करदात्यांना भरावा लागणार आहे. अनेक व्यापाऱयांना यामुळे दिलासा मिळणार आहे. व्यापाऱयांना जीएसटीआर 3-बी फाईल रिटर्न भरण्याची गरज असते. तरी व्यापाऱयांनी रिटर्न फाईल 30 सप्टेंबर 2020 पर्यंत भरणे गरजेचे असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.