ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 2018-19 या आर्थिक वर्षातील जीएसटी रिटर्न भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज याबाबतची घोषणा केली.
अर्थमंत्री सीतारामन यांनी आज व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सीतारामन म्हणाल्या, कोरोनामुळे देशातील उद्योग-व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना उभारी घेण्यासाठी काही कालावधी लागेल. त्यामुळे 2018-19 या आर्थिक वर्षातील जीएसटी रिटर्न भरण्यासाठी केंद्र सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 5 कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या कंपन्यांना कोणताही व्याज दर, लेट फी आणि जीएसटी उशिरा भरल्याबद्दल दंड आकारला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने उद्योग आणि व्यवसायाच्या बाजूने घेतल्या गेलेल्या दुसर्या निर्णयात केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क विभागाची ई-बिले 24 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी संकलित केली गेली होती. ज्याची मुदत 20 मार्च ते 15 एप्रिल 2020 होती. त्यांची वैधताही वाढविण्यात आली आहे.