ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय अर्थव्यवस्थेची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये 20.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचे मूल्यमापन करण्याचा जीडीपी हा सर्वात अचूक मार्ग आहे. मागील आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत देशाच्या जीडीपीमध्ये 24.4 टक्क्यांनी घट झाली होती.
जीडीपीमधील सकारात्मक वाढ हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक चांगले लक्षण आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) इकोरॅप अहवालात एप्रिल-जून तिमाहीत जीडीपीमध्ये 18.5 टक्के वाढ होण्याचा अंदाज होता. भारतीय रिर्झव्ह बँकेने पहिल्या तिमाहीत जीडीपीवाढ 21.4 टक्के होण्याचा अंदाज दिला होता.