ऑनलाईन टिम : सांगली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिमांसाठी राष्ट्रीय मुस्लिम मंच सारख्या अनेक संघटना स्थापन केल्या आहेत. महंमद अली जिना यांनी पाकिस्तान निर्माण करण्यासाठी भारताची एकदाच फाळणी केली होती, मात्र भाजपचे नेते आपल्या वक्तव्यातून हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करून देशाचे विभाजन करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला.
विदर्भातील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यक्रमादरम्यान नागपुरात पत्रकार परिषदेला संबोधित करताना राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष जनसेना असा शब्दप्रयोग करत भाजपवरही टीका केली. “भारतात 22 कोटींहून अधिक मुस्लिम राहतात आणि त्यापैकी अनेकांनी भाजप आणि शिवसेनेला मतदान केले आहे. महंमद अली जिना यांनी फक्त एकदाच (पाकिस्तान बनवण्यासाठी) भारताची फाळणी केली होती, परंतु भाजप नेते त्यांच्या विधानांद्वारे हिंदूंमध्ये तेढ निर्माण करून दररोज भारताची फाळणी करत आहेत.” असे राऊत यांनी आरोप केला.