प्रतिनिधी/ पणजी
गेले अनेक महिने संपावर असलेले जीवरक्षक आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेण्यासाठी सचिवालयावर रॅली काढणार आहे. सकाळी 11 वा. आझाद मैदान ते क्रांती सर्कल पर्यंत रॅली काढली जाणार आहे. जीवरक्षक आपल्या मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देणार असल्याचे कामगार नेत्या स्वाती केरकर यांनी सांगितले.
गोवा पर्यंटन विकास महामंडळात सेवेत कायम करावे sतसेच नोकरीला सुरक्षा पुरवावी या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरच आहे. तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीतर येणाऱया काळात आमरण उपोषण करण्याचा ईशारा या जीवरक्षकांनी दिला आहे.
या कंपनीकडून जवरक्षाकांची सतावणूक होत आहे. मंत्र्यांना या विषयी विचारायला गेले तर त्या कामगारांचे आम्हाला लागत नाही दृष्टी कंपनी बघून घेणार अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. एवढी वर्षे काम करुन त्यांना फक्त 12 हजार पगार दिला जातो. पूर्ण दिवस काम करुन कुठल्याच मेडिकल सुविधा नाही. कंपनी काहीच जबाबदारी घेत नाही. हे मंत्री या कंपनीचे दलाल झाले आहे, असा आरोप स्वाती केरकर यांनी केला.
या कंपनीचे कंत्राट संपले आहे तरी सरकारने कंपनीला कंत्राट वाढवून दिले आहे. या जीवरक्षकांना पगार दिला जातो तो कंपनी स्वतःच्या खिशातून नाही तर तो सरकारचा पैसा आहे. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर हे कंपनीची बाजू घेत असून त्यांना जीवरक्षकांचे काहीच पडलेले नाही.
हे जीवरक्षक सर्व स्थानिक गोमंतकीय आहे. सरकारने या गोमंतकीय कर्मचाऱयावर अन्याय केला आहे. या जीवरक्षकांनी अनेक पर्यटकांचा जीव वाचवला आहे. पण जीवरक्षक संपावर गेल्याने आज पर्यटन किनारी सुरक्षा अपुरी पडत आहे. दृष्टी कंपनी अनुभव नसलेले जीवरक्षक आणून पर्यटकांचा जीव धोक्यात घालत आहे असे कामगार नेत्या स्वाती केरकर यांनी सांगितले.