रेल्वे ट्रकवर पतंग उडविणाऱया मुलांना आवरणार कोण? : लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या पतंग उडविण्याचा आनंद लुटण्यासाठी बालचमुंची धावपळ वाढली आहे. पण पतंग कुठे आणि कशी उडवायची याचे भानही बालचमुंना नसते. आपला जीव धोक्मयात घालून पतंग उडविणाऱया मुलांची गर्दी रेल्वे ट्रकवर वाढली आहे. याकडे पालकांसह रेल्वे सुरक्षा दलाचेदेखील दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रेल्वे ट्रकवर पतंग उडविणाऱया मुलांना आवरणार कोण, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून विविध खेळांपासून वंचित राहिलेले विद्यार्थी पतंग उडविण्याचा आनंद लुटण्यासाठी सुटीच्या दिवशी बाहेर पडताना दिसत आहेत. रविवारी सुटी असल्याने असंख्य मुले पतंग उडविताना निदर्शनास आली. मात्र पतंग कुठे व कशी उडवायची याचे भान राहिले नसल्याचे निदर्शनास आले. भांदूर गल्ली परिसरात चक्क रेल्वे ट्रकवर थांबून मुले पतंग उडवत होती. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने रेल्वे गाडय़ांची वाहतूक वाढली आहे. रेल्वेंची संख्या वाढविण्यात आली असून, बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रेल्वे ट्रकवरून रेल्वे गाडय़ांची वर्दळ नेहमीच असते. पण अशा मार्गावर जीव धोक्मयात घालून काही मुले ट्रकवर उभे राहून पतंग उडवत होती. याकडे पालकांचे आणि रेल्वे प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे.
मुले पतंग उडविण्यासाठी टेरेसवर धाव घेतात. पतंग उंच उडावी यासाठी टेरेसच्या टॉपवर चढतात पण पतंग उडवताना आपण कुठे आहे याचे भान रहात नाही. त्यामुळे इमारतीवरून तोल जाण्याचा धोका अधिक आहे. पण मुले घरी न सांगता टेरेसवर थांबून पतंग उडवित असतात. त्यामुळे सध्या जीव धोक्मयात घालून पतंग उडविणाऱया मुलांवर लक्ष ठेवणे काळाची गरज आहे.