ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 1 मे पासून सुरू झाला आहे. पण लसीच्या कमतरतेमुळे ही मोहीम थोडी मंदावली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी जुलैपर्यंत देशात लसीची कमतरता भासू शकते, असे म्हटले आहे.
पूनावाला यांनी म्हटले की, केंद्राने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या लसीकरणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे देशात लसीची कमतरता भासत आहे. लसीची उत्पादन क्षमता दिवसाला 60 ते 70 दशलक्ष डोसवरून 100 दशलक्ष डोसपर्यंत वाढविण्यासाठी जुलै उजाडेल.