प्रवासी संख्या 82 टक्क्मयांनी घटली : डीजीसीएच्या आकडेवारीतून स्पष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू वर्षातील जुलै महिन्यात देशात एकूण 21.07 लाख लोकांनीच देशांतर्गत हवाई प्रवास केला आहे. मागील वर्षात समान कालावधीच्या तुलनेत हा आकडा 82.3 टक्क्मयांनी कमी राहिल्याची नोंद केली आहे. यासोबतच जून महिन्यात सहा प्रमुख इंडियन एअरलाईन कंपन्यांपैकी पाचमध्ये 50 ते 60 टक्के ऑक्मयुपेंसी राहिलेली आहे, अशी माहिती सिव्हील एव्हीएशन रेग्युलेटर डीजीसीए यांनी दिली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे मर्यादीत हवाई वाहतूक सुरु करण्यात आल्याच्या कारणामुळे जुलै 2020 मध्ये पॅसेंजरचा भार मोठय़ा प्रमाणात घसरत गेल्याचे पहावयास मिळाले असल्याचेही डीजीसीए यांनी सांगितले आहे. जुलैमध्ये स्पाईसजेटचा क्षमतेचा 70 टक्के वापर झाला आहे. तर अन्य कंपन्यांमध्ये इंडिगो 60.2, गो एअर 50.5, विस्तार53.1 , एअर इंडिया 56.2 आणि एअर इंडिया 45.5 टक्क्मयांवर राहिला आहे.
नियमांच्या पालनासह सेवा
जुलैमध्ये सामाजिक अंतर राखत एअर इंडियाची चार मेट्रो विमानतळे सुरु आहेत. यामध्ये बेंगळूर, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबई आदींचा समावेश आहे. परंतु यामध्ये मुंबईच्या विमानतळाची 98.1 टक्क्मयांसोबत सर्वाधिक चांगली कामगिरी राहिल्याची नोंद डीजीसीएच्या आकडेवारीतून करण्यात आली आहे. सर्व आवश्यक नियमांचे पालन करत ही सेवा सुरु असल्याचे विमान कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.