प्रमुख क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशामधील नोंदणीकृत कंपन्यांची संख्या जून 2020 च्या अंतिमपर्यंत 20 लाखाहून अधिक झाली आहे. यामधील 7.4 लाखापेक्षा अधिक कंपन्या विविध कारणांमुळे बंद झाल्याची माहिती सरकारी आकडेवारीमधून समोर आली आहे.
देशात जूनमध्ये 12.15 लाखापेक्षा अधिक सक्रिय कंपन्या होत्या. तर साधारणपणे सक्रिय कंपन्यांनी मात्र नियमितपणे कंपनी कार्य मंत्रालयाकडे आवश्यक त्या दस्ताऐवजाची फाईल करत असल्याचे कंपनी कार्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून सांगितले आहे.
देशातील अन्य कंपन्यांची आकडेवारी पाहिल्यास यामध्ये 30 जूनपर्यंत 20,14,969 नोंदणीकृत कंपन्या होत्या परंतु यातील 2,242 कंपन्या निष्क्रिय असल्याची माहिती असून यातील 7,46,278 कंपन्या बंद झाल्या आहेत. तसेच 43,770 कंपन्या रद्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे.