ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. रविवारी रात्री जेएनयूमध्ये घडलेल्या प्रकारावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, आज देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जात आहे, त्यांची चेष्टा केली जात आहे. मोदी सरकारच्या संरक्षणाखाली देशातील तरुणांचा आवाज दाबून हिंसाचाराला उत्तेजन दिले जात आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे.