कोल्हापूर/प्रतिनिधी
जे. एन. यू. विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापकांवर हल्ला केलेल्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करा, यासह अन्य मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने बिंदू चौकात धरणे आंदोलन करून, निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱयांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. शेतकऱयांनी हल्लेखोरांच्या निषेधार्त केलेल्या निदर्शनाने बिंदू चौक परिसराचे लक्ष वेधून घेतले.
या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने एनआरसी, सीएए, एनपीएसारखे कायदे करून भारतीय जनतेला संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारावरच हल्ला केला जात आहे. हे कायदे त्वरीत रद्द करावेत. काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी काठय़ा, हॉकी स्टीकने विद्यार्थी व प्राध्यापकांना मारहाण केली. हा हल्ला म्हणजेच लोकशाहीवर केलेला हल्ला आहे. कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवत सत्तेचा वापर करून देशात दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सरकारने त्वरीत हल्लेखोरांना अटक करून, देशातील दहशत थांबवावी, आदी मागण्यांसंदर्भात श्रमिक मुक्ती दलाने निदर्शने केली.
यावेळी कार्याध्यक्ष संपत देसाई, संतोष गोटल, मारूती पाटील, डी. के. बोडके, नजीर चौगले, शंकर पाटील, वसंत पाटील आदी उपस्थित होते.