लहानपणी शाळेमध्ये असताना वर्गाच्या भिंतींवर बोधवाक्ये लिहिलेली असत. त्यामुळे अजाणतेपणाने विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार होत असत. त्यातलेच एक बोधवाक्मय इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेले आजही आठवते, ते म्हणजे If wealth is lost, nothing is lost. If health is lost, something is lost, but if character is lost everything is lost. (काही शाळांमध्ये आजही अशी बोधवचने लिहिलेली आढळतात) यामध्ये काही धन कमावण्यापेक्षा चारित्र्य घडविण्यावर भर दिलेला आहे . दुर्दैवाने समाजामध्ये आज परिस्थिती नेमकी उलटी दिसते आहे, त्यामुळे असे म्हणावेसे वाटते की सद्यस्थितीत काही अपवाद वगळता वरील बोधवाक्मय पुढीलप्रमाणे समाजामध्ये पाळले जाते If character is lost nothing is lost, if health is lost something is lost but if wealth is lost everything is lost. वाचकांना हा कदाचित उपहास वाटेल पण सद्य परिस्थितीत चारित्र्य घडविण्यापेक्षा काही करून धन मिळवावे मग ते कोणत्याही मार्गाने का असेना याकडे लोकांचा कल दिसून येतो आहे. याचे उदाहरण म्हणजे सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार. जगण्यासाठी धन निश्चितच आवश्यक आहे पण आपला खर्च पाहता आपल्याला दिसून येईल की जगण्यासाठी लागणारा खर्च इतर खर्चापेक्षा अत्यंत कमी आहे. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की लोक सर्वात जास्त खर्च मनोरंजनासाठी करतात. त्यामध्ये टी.व्ही., सिनेमा, पाटर्य़ा, निरनिराळे खेळ, मोबाईल, गाडय़ा, शरीराला आणि मनाला घातक असणारी अनेक व्यसने इत्यादीवर होतो. त्यानंतर घरभाडे अथवा घराचे हप्ते भरण्यासाठी खर्च होतो. वैद्यकीय आणि औषधासाठी होणारा खर्च तिसऱया क्रमांकावर आहे आणि शरीरासाठी म्हणजे अन्न व वस्त्र यांचा खर्च सगळय़ात कमी आहे. या सर्वांची जुळवाजुळव करण्यासाठी प्रत्येकाची तारांबळ उडते आणि मग धन मिळविण्याच्या नादात त्यापाठीमागे येणाऱया दुष्परिणामांची आपल्याला जाण राहत नाही. त्यासाठी हे ध्यानात ठेवले पाहिजे की केवळ धन कमविणे हाच जीवनाचा उद्देश असू नये.
श्रीमद् भागवत ग्रंथामध्ये धनाबरोबर येणाऱया दुष्परिणामाचे वर्णन केले आहे (स्कंध 11 अध्याय 23 श्लोक 15 ते 21) ‘कृपणाचे धन त्यांना कधीही सुख देत नाही. इहलोकी त्यांना धनामुळे अतिशय त्रास होतो आणि मृत्यूनंतर त्यामुळेच ते नरकातही जातात. ज्याप्रमाणे चेहऱयावरील डाग एखाद्याचे रूपलावण्य नष्ट करतो त्याप्रमाणे अत्यल्प प्रमाणातील धनलोभ यशस्वी लोकांचे पवित्र यश आणि गुणवंतांचे वर्णनीय गुण नाहीसे करू शकतो. धनाची प्राप्ती, वाढ, रक्षण, व्यय, नाश आणि भोग करताना सर्वाना श्रम, भय, चिंता आणि भ्रम होत असतो. चोरी, हिंसा, असत्य बोलणे, दंभ, काम, क्रोध, वेडेपणा, उन्माद, मतभेद, वैर, अविश्वास, मत्सर, परस्त्री अभिलाषा, जुगार आणि नशापान हे पंधरा अनर्थ द्रव्यापायी होतात. हे अनर्थ असूनही ते लोकांना स्पृहणीय वाटतात, यास्तव स्वकल्याणेच्छुक व्यक्तीने यापासून दूर राहणेच इष्ट आहे. बंधू, पत्नी, माता पिता, त्याचप्रमाणे स्नेही यांच्यामध्येही धनामुळे फूट पडते. एकजीव असलेले हे लोक दीडदमडीमुळेही तात्काळ एकमेकांचे वैरी होतात. अगदी थोडक्मया धनासाठी हे मित्रबांधव अत्यंत क्षुब्ध होतात. त्यांचा क्रोध पेटून उठतो आणि मैत्री सोडून ते स्पर्ध्यात्मक भावनेत क्षणाचाही अवधी ना दवडता परस्परांचा त्याग करतात, अथवा क्वचित प्रसंगी एकमेकांचा जीव घेण्यासाठीही मागेपुढे पाहत नाही.’ हे वर्णन आपले डोळे उघडे असतील तर आपल्याला दररोजच्या व्यवहारातून आढळून येईल. जोपर्यंत धन आहे तोपर्यंत सर्व काही आहे. आपल्याजवळ धन नसल्यास कोणीही आपल्याला जवळ सुद्धा करणार नाही. संत तुकाराम महाराजसुद्धा हेच सत्य एका अभंगात वर्णन करतात. धनवंतांलागीं । सर्व मान्यता आहे जगी ।। 1।। माता पिता बंधू जन । सर्व मानिती वचन ।।2।। जंव मोठा चाले धंदा । तंव बहीण म्हणे दादा ।।3।। सदा शृंगार भूषणे । कांता लवे बहुमाने ।।4।। तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत जाण ।। 5।। अर्थात ज्याच्याजवळ पुष्कळ धन आहे त्याला जगामध्ये मान्यता आहे. त्याचे वचन आई वडील, बंधू, नातेवाईक व इतर लोक मानतात. जोपर्यंत द्रव्याच्या योगाने मोठा व्यापार चालत आहे तोपर्यंत बहिणी त्याला दादा म्हणून सन्मानाने वागवतात. पत्नीच्या अंगावर उत्तम प्रकारचे दागदागिने सर्वकाळ घातले म्हणजे ती आज्ञेमध्ये राहून पतीला मानते. असले हे धनामुळे मिळालेले भाग्य नाशिवंत आहे हे जाणून घ्या. जे धन सत्धर्मासाठी वापरले जात नाही ते धन कलियुगाच्या प्रभावाने विशेषकरून चार ठिकाणी खर्च केले जाते याचेही श्रीमद भागवतमध्ये वर्णन येते. ती स्थाने म्हणजे जुगार, मद्यपान, वेश्यावृत्ती-कुंटणखाने, मांसाहार या चार अधार्मिक कृत्यामुळे सत्य, तपश्चर्या, पवित्रता व दया हे धर्माचे चार खांब खिळखिळे होऊन आपल्या चारित्र्याची इमारत ढासळते. परिणामी आपले मन सदा असंतुष्ट व अशांत राहते. जुगारामुळे सत्य नष्ट होते, मद्यपान केल्याने तपश्चर्या करण्याची वृत्ती नष्ट होते, वेश्यावृत्ती अथवा विवाहबाह्य अनियंत्रित स्त्रीपुरुष संगतीने मनाची व शरीराची पवित्रता नष्ट होते व मांसाहार केल्याने दयाभाव नष्ट होतो. म्हणून ज्याला कोणाला आपल्या कल्याणाची इच्छा असेल त्याने विशेषतः राजा, धर्मशील मनुष्य, सार्वजनिक नेता, गुरु (ब्राम्हण व संन्यासी) यांनी वरील चार अधार्मिक गोष्टींच्या संपर्कातसुद्धा कधी येऊ नये. पण दुर्दैवाने कलियुगाच्या प्रभावाने समाजामध्ये वरील चारीही गोष्टी सन्माननीय ठरविल्या जातात. याचा परिणाम म्हणून लोक आपल्या कमाईतील जवळ जवळ अर्धेअधिक द्रव्य वरील चार गोष्टींमध्ये ऐषआरामाच्या नावाखाली खर्च करतात. आणि या चार गोष्टींचे एकदा व्यसन लागले की मग कितीही धन मिळाले तरी ते कमीच पडते. यातूनच भ्रष्टाचाराचा उगम होतो. त्याचप्रमाणे वित्तमेव कलौ नृणां जन्माचारगुणोदयः म्हणजे कलियुगात धन हेच मनुष्याचे कुळ, शील आणि गुणोत्कर्षाचे माप असेल हेही वर्णन श्रीमद् भागवतमध्ये येते. याचा परिणाम म्हणून आपण समाजामध्ये पाहतो की मनुष्याचे ज्ञान, संस्कृती, आचरण, चरित्र न पाहता त्याच्याजवळील धनावरूनच त्याची उच्च, मध्यम व कनि÷ श्रेणी ठरविण्यात येते. कलियुगात ज्ञान व सद्गुण संपादन करण्याऐवजी धनार्जन करण्याकरिता पाशवी स्पर्धा केली जाते. यात ज्याची सरशी होईल त्याला अज्ञानी भोगवादी समाज अत्यंत प्रति÷ित व विद्वान समजू लागतो. या दुष्ट चक्रातून सुटण्याची ज्याची प्रामाणिक इच्छा आहे त्यांना तुकाराम महाराज सुचवितात धन मिळवुनी कोटी। सवे नये रे लंगोटी ।। 1।। पाने खाशील उदंड । अंती जाशी सुकल्या तोंड ।।2।। पलंग न्याहाल्या सुपती । शेवटी गोवऱया सांगाती ।। 3।। तुका म्हणे राम । एक विसरता श्रम ।।4।। अर्थात आपल्या आयुष्यात कोटय़वधींची संपत्ती जमा केली तरी मृत्यू झाल्यावर कमरेची लंगोटीसुद्धा बरोबर येत नाही. आयुष्यभर पान खाऊन तोंड रंगविले तरी अखेर सुक्मया तोंडानेच जावे लागेल. पलंगावर मऊ गादीवर झोपण्याचे सुख वाटते पण मरणाअंती शेणाच्या गोवऱयावरच झोपावे लागते. एक श्रीराम नाम जर तू विसरलास तर तुझा जन्म व्यर्थ जाईल. थोडक्मयात सांगायचे तर मनुष्य जीवन केवळ धन कमावण्यातच वाया ना घालवता भगवंताचे ध्यान (नामस्मरण) करून सार्थकी लावावे व कितीही धन खर्च करून न प्राप्त होणारी भगवद्भक्ती प्राप्त करावी.
वृंदावनदास