नाना पटोलेंचा मोंदींवर निशाणा
ऑनलाईन टीम / तरुण भारत
गेले सात दिवस म्हणजेच 24 फेब्रुवारी पासुन युक्रेन आणि रशिया यांच्यात अतिव रणकंदन पेटले असुन यामुळे युक्रेनमध्ये अऩेक देशातील नागरिक अडकल्याने जगातील अनेक देश चिंतेत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत अऩेक भारतीय नागरीक, विद्यार्थी अडकुन पडले असुन काल दि. 1 मार्च रोजी भारतीय विद्यार्थी किराणा साहित्य आणण्यास बाहेर पडल्यानंतर झालेल्या बॉम्ब हल्यात या विद्यार्थ्याचा मृत्यु झाला आहे. अशी स्थिती असल्याने राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्थितीकडे वेळीच लक्ष न दिल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी शेलक्या शब्दात मोंदींचा समाचार घेतला आहे. मंगळवारी गोंदीयामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ सुरु केले असले तरी सर्व भारतीय नागरीक आणि विद्यार्थी परतलेले नाहीत. यामुळे युक्रेनमधून मदतीची याचना करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांपुढील संकट अधोरेखित झाले आहे. यामुळे विरोधकांनी सरकारने उशीरा हलचाली सुरु केल्याने विद्यार्थी अडकून पडल्याची टीका केलीय.
कोरोना लाटेत गंगा नदीत लोकांची प्रेतं पहायला मिळाली, मग ते जागे झाले. दुसऱ्या लाटेत पाच राज्यांच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये कोरोनामुळे अनेकांचा जीव गेल्याचं पाहिले, आणि आता अनेक विद्यार्थी, नागरीकांचा जीव धोक्यात असताना ही केंद्र सुस्त असल्याचं ही ते यावेळी म्हणाले आहेत.रशियाच्या माध्यमातून सातत्याने युक्रेनमध्ये युद्धाचा इशारा दिला जात होता. तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की बाकीचे देश आपल्या आपल्या पोरांना घेऊन गेले. पण आपल्या देशातून कुठली मदत केली नसल्याचे ते म्हणाले.