ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व एकाकी राहणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक सेवांची सुविधा घरपोच द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
वयोवृद्ध, अपंग किंवा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.या सेवेचा लाभ घेण्यासाठी संबंधित गरजू व्यक्तीने हेल्पलाईन वर संपर्क साधल्यास त्यांना ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन तयार करण्यात आली असून संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. तसेच पोलीस यंत्रणेमार्फत यासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नेमण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रासाठी 1800 211 2 92 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. ही सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत सुरू राहणार आहे.