अनेक संस्थांचा आधारवड हरपला
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात मुक्तसंचार करणारे ज्ये÷ पत्रकार व लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष अशोक याळगी (वय 82) यांचे गुरुवारी उत्तर रात्री अडीच वाजता विनायकनगर येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत दुपारी 12 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अशोक याळगी यांच्या निधनाने बेळगावकरांना धक्का बसला आहे. तरुण भारत सोशल मीडियावर पहाटे त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसारित झाले तेव्हा अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. पुन्हा पुन्हा खात्री करुन घेतल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. अखेरपर्यंत कार्यरत असणारे याळगी असे अचानक निघून जातील यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता.
विविध संस्थांच्या पदाधिकाऱयांनी घेतले अंत्यदर्शन
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बेळगावमधील विविध संस्थांच्या पदाधिकाऱयांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांना आदरांजली अर्पण केली. तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री यांनी ‘तरुण भारत’ परिवारातर्फे त्यांना आदरांजली अर्पण केली. लोकमान्य सोसायटी, लोकमान्य ग्रंथालय, बुलक, लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्र, वरेरकर नाटय़ संघ, शारदोत्सव सोसायटी, मराठी नाटय़ परिषद, नाटय़ांकुर, वाङ्मय चर्चा मंडळ, मंथन, रंगभूमी ग्रुप, खुला आसमान, सार्वजनिक वाचनालय, सरस्वती वाचनालय, वसंत व्याख्यानमाला, रसिकरंजन, जीवनविवेक प्रति÷ान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इंप्रेशन, कम्युनिस्ट पक्ष, कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठ, ज्ये÷ नागरिक संघ, म. ए. समिती, वि. गो. साठे प्रबोधिनी, स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघ, सिद्धार्थ बोर्डिंग, फ्रेन्डस् सर्कल, जिजामाता बँक, कडोली साहित्य संघ, माय मराठी संघ-सांबरा, बलभीम साहित्य संघ कुदेमानी, गुंफण साहित्य संमेलन, बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समिती, पत्रकार विकास अकादमी, शब्दगंध कवि मंडळ या संस्थांचे पदाधिकारी, बेळगाव समाचार, साम्यवादी, वृत्तपत्राचे प्रतिनिधी यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सीमाप्रश्नाची जाण
दुपारी 12 वाजता सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी बोलताना माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी अनेक संस्थांचा आधार असलेले याळगी यांचे जाणे हे चटका लावणारे आहे, असे सांगितले. सीमाप्रश्नाची त्यांना जाण होती. यासाठी त्यांनी लढाही दिला होता. बेळगावमधील अनेक संमेलनांना त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अशोक याळगी यांचे जाणे धक्कादायक
राम आपटे म्हणाले, ‘पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा’ या ओळीची प्रचिती यावी असे याळगी यांचे जाणे धक्कादायक आहे. अंनिस आणि जीवन विवेक प्रति÷ान या संस्थांमध्ये ते सक्रिय होते. त्यांच्या बहुमोल सूचना कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त ठरत असतं. मागील 60 वर्षांपासूनचा त्यांचा सहवास होता. आता ही व्यक्ती नसेल हे न पटणारे आहे.
धडाडीचा पत्रकार हरपला
जगदीश कुंटे म्हणाले, याळगींच्या जाण्याने एक धडाडीचा पत्रकार हरपला आहे. तरुण भारतमधील याळगी यांनी चालविलेली विविध सदरे प्रशासनाला अक्षरशः धडकी भरवत. बेळगावच्या सांस्कृतीक क्षेत्राचा ते अविभाज्य घटक होते. बेळगावमध्ये मराठीपण टिकवून ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने बेळगावच्या संस्था पोरक्मया झाल्या आहेत. परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघाला याळगी यांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज होती, त्यांचे जाणे हे संघाला पोरके करणारे ठरले आहे, असे सांगितले. सीमाप्रश्नी 1956 मध्ये झालेल्या पहिल्या सत्याग्रहात विद्यार्थ्यांच्या तुकडीत सहभागी अशोक याळगी ते आजवर अनेक गोष्टींचे नेतृत्व करणारे अशोक याळगी हा जीवनपटच त्यांनी थोडक्मयात उलगडला. पत्रकार सुभाष कुलकर्णी यांनी अनुभवी पत्रकार हरपला अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
शनिवारी शोकसभा
बेळगाव शहरातील विविध संघ-संस्था आणि सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात कार्यरत घटकांच्यावतीने एकत्रित शोकसभा घेवून अशोक याळगी यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. शनिवार दि. 12 रोजी दुपारी 4 वाजता वरेरकर नाटय़संघाच्या सभागृहात ही शोकसभा होणार आहे, अशी माहिती जगदीश कुंटे यांनी दिली आहे.
ग्रंथालय बंद
अशोक याळगी यांच्या निधनामुळे दि. 11 व 12 डिसेंबर रोजी ग्रंथालय बंद राहणार आहे, असे ग्रंथालयातर्फे कळविण्यात आले आहे.
सोशल मीडियावरुन श्रद्धांजली
पत्रकार सरजू काटकर हे याळगी यांचे समकालीन. अंत्यसंस्काराला उपस्थित राहता न आल्याने त्यांनी आपल्या जुन्या मित्राला सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली. बेळगाव म्हणजे कन्नड आणि मराठी वाद आला. पत्रकारितेतही हे वाद तेव्हापासून आहेत. मात्र एकत्रित राहूनही कन्नड पत्रकार कन्नडच्या बाजूने आणि मराठी पत्रकार मराठीच्याबाजूने कसे काम करु शकतात हे अशोक याळगी यांनी 80 च्या काळात दाखवून दिले होते. त्यांचे लिखाण स्फोटक होते. म्हणूनच ते वाचकप्रियही होते, असे त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.