सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय ललीत यांचे उद्गार
प्रतिनिधी /मडगाव
देशातील गरीब जनतेला एक तर कायदय़ाचे कोणतेच ज्ञान नसते आणि दुसरे त्यांचा कायदय़ावर विश्वास नसतो, अशा वेळी देशातील ज्येष्ठ वकिलांनी आपल्या सेवेचा लाभ गरीबां पर्यंत पोचवावा तसेच त्यांना कायदय़ाच्या दृष्टीकोनातून जागृत करायला पाहिजे असे उद्गार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण पॅन इंडिया जनजागृती मोहिमेचे कार्यकारी अध्यक्ष उदय उमेश ललीत यांनी काढले.
मडगाव गोमंत विद्या निकेतनच्या सभागृहात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण पॅन इंडिया जनजागृती मोहिमेचे उद्घाटन न्यायाधीश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्यायाधीश महेश सोनक, न्यायाधीश मनिष पितळे, न्यायाधीश मुकूलिका जवळकर, ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. कुयेल्हो परेरा, दक्षिण गोवा वकिल संघटणेचे अध्यक्ष ऍड. क्लोविस आंतोनियो डिकॉस्ता इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.
2 ऑक्टोबर पासून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण पॅन इंडिया जनजागृती मोहिम देशभरात राबविली जात असून ती 45 दिवस चालणार आहे. या मोहिमेतून कायदय़ाची सेवा गरीब व गरजूवंत लोकांना मिळविण्यासदंर्भात जागृती करण्यात येत असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय ललीत यांनी दिली.
गरीबांना कायदय़ाशी जोडा
देशातील गरीब जनतेला कायदय़ाची सेवा मिळत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत असतो. त्यांना कायदय़ाचे ज्ञान नसते, त्यांच्यामध्ये कायदय़ाची जागृती व्हायला पाहिजे. त्यांना कायदय़ाशी जोडले पाहिजे आणि हे काम देशातील तज्ञ व ज्येष्ठ वकिलच योग्यरित्या करू शकतात. वकिलच न्यायालयात आपल्या अशिलाची बाजू मांडतात व न्याय मिळवून देतात, न्यायाधीश सर्व बाबी लक्षात घेऊन न्याय देण्याचे काम करतात असे न्यायाधीश श्री. ललीत या प्रसंगी बोलताना म्हणाले.
आकडेवारी प्रत्यक्षात दाखवतात की, न्यायालयात प्रलंबित 100 प्रकरणे प्रलंबित आहेत ती प्रकरणे कायदेशीर बाबची असतात. त्यात एक टक्काही गरीबांच्या प्रकरणाचा नसतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. बाल गुन्हेगारीत सापडलेल्या मुलांना शिक्षा झाली की, त्यांना कोठडीत ठेवले जाते, अशा वेळी त्यांच्या मनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. त्यांच्याशी विविध माध्यमांतून संपर्क साधून त्यांना मार्गदर्शन व्हायला पाहिजे असे न्यायाधीश श्री. ललीत म्हणाले. सुरवातीला न्यायाधीश महेश सोनक यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम व ऍड. कुयेल्हो परेरा यांनी आपले विचार मांडले.