प्रतिनिधी / बेळगाव
वाहनधारकांच्या सुविधेसाठी राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करून विकास करण्यात आला आहे. शहरात येणाऱया ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. पण उड्डाणपुलाच्या भिंतीवर झाडे उगवत असून, धोका निर्माण होण्याची शक्मयता आहे. या उड्डाणपुलाच्या देखभालीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामंडळाचे दुर्लक्ष झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाकडून रस्त्यांचा विकास करण्यासाठी भूसंपादन करण्यात येते. राष्ट्रीय महामार्गाची रुंदी वाढविण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी करून वाहनचालकांना सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र शहराच्या प्रवेशद्वारावर तसेच ठिकठिकाणी भुयारी रस्ते करताना उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या भिंतीवर लहान लहान झाडे उगवत असून ती मोठी झाल्यास धोका निर्माण होण्याची शक्मयता आहे. उड्डाणपुलाच्या भिंतीला तडे जाऊन पुलालाच भगदाड पडू शकते. परिणामी ये-जा करणाऱया वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. सदर झाडे मोठी होण्यापूर्वीच हटवून पुलाची देखभाल करण्याची गरज आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाच्या अधिकाऱयांसह रस्ते देखभाल करणाऱया कंपनीकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. झाडे मोठी होऊन धोका निर्माण होण्यापूर्वी सदर झाडे हटविण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.