ऑनलाईन टीम / रांची :
कोरोनाा विषाणू दुसऱ्या लाटेत देशभरात अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. झारखंडमध्ये देखील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने पुन्हा एकदा ‘मिनी लॉकडाऊन’ ( आरोग्य सुरक्षा सप्ताह) चा कालावधी 10 जूनपर्यंत वाढवला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या उपस्थितीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतत माहिती देताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, राज्यातील सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेता आता राज्यात 10 जूनच्या सकाळी 6 वाजेपर्यंत ‘मिनी लॉकडाऊन’ असणार आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हेमंत सरकारने मागील 22 एप्रिल पासून आरोग्य सुरक्षा सप्ताहाची सुरुवात केली होती, ती अजूनही जारी आहे.
या ‘मिनी लॉकडाऊन’ मध्ये ई- पास ची सक्ती बंद करण्यात आली आहे. तसेच काही अटींसह अनेक गोष्टींवर सूट देण्यात आली आहे.
- 10 जूनच्या सकाळी 6 वाजेपर्यंत ‘मिनी लॉकडाऊन’ मध्ये वाढ
- जिल्ह्याच्या अंतर्गत तथा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ये – जा करण्यासाठी ई – पास ची सक्ती रद्द करण्यात आली आहे.
- अंतर्गत राज्य आणि अंतर्गत जिल्ह्यातील बस परिवहन सेवा अजूनही बंदच असेल.
- झारखंडमधील जिल्ह्यांना दोन विभागात वाटून सूट दिली जाणार आहे. यामध्ये राज्यात अधिक कोरोना संसर्ग असणारे 9 जिल्हे म्हणजेच रांची, जमशेदपूर, बोकारो, धनबाद, देवघर, हजारीबाग, गढवा, गुमला आणि रामगढमध्ये कपडे, चप्पल आणि दागिन्यांची दुकाने सोडून अन्य सर्व दुकाने सुरू केली जाणार आहेत.
- तर अन्य 15 जिल्ह्यांमध्ये सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यात दुपारी 2 वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवली जाणार आहेत.
- मॉल आणि मल्टी ब्रँड वाली दुकाने बंदच असणार आहेत.
- लग्न समारंभ अजूनही बंदच असतील.
- यासह स्विमिंग पूल, जीम, पार्क, मेला, सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स, सलून, प्रदर्शने आदीं अजूनही पाहिल्याप्रमाणे बंदच असणार आहे.