पटना : लोकांमध्ये भीती पसरवण्यासाठी सीपीआय-माओवाद्यांनी गुरुवारी झारखंड-बिहार बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान काही ठिकाणी रेल्वेमार्ग उखडल्यामुळे दिल्ली-हावडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तासाभराच्या संघर्षानंतर गाडय़ांची वाहतूक सुरळीत झाली. त्याचबरोबर चतरा येथे माओवाद्यांनी रस्त्याची नासधूस केल्यामुळे रस्ते वाहतूकही खोळंबली होती. रात्री 12.15 च्या सुमारास रेल्वे ट्रकवर स्फोट घडवून ट्रक उडवण्यात आला. या घटनेमुळे या मार्गावरून जाणाऱया गाडय़ांची वाहतूक विस्कळीत झाली होती. यासंबंधीची माहिती मिळताच सरिया-बगोदर व इतर जिह्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर रेल्वे कर्मचाऱयांनी ट्रक दुरुस्त केल्यानंतर सकाळपासून रेल्वेगाडय़ा मार्गस्थ झाल्या. चौधरी डॅम स्थानकावर गंगा-दामोदर एक्स्प्रेस, हजारीबाग रोड स्थानकावर जोधपूर-हावडा एक्स्प्रेस, पारसनाथ स्थानकावर हावडा मुंबई मेल, लोकमान्य टिळक एक्स्प्रेस आणि इतर अनेक गाडय़ा विविध स्थानकांवर थांबल्या होत्या.
Trending
- दक्षिणोत्तर विकास पर्वामुळे ‘दक्षिण‘ची जनता मंडलिक यांच्या पाठीशी- राजेश क्षीरसागर
- कोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा : दोन लाखावर लोक जमतील
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेळगाव दौऱ्यात बदल
- दोन भावांचे मृतदेह सापडल्याने खळबळ
- सांकवाळ येथे 27 रोजी पंतप्रधानांची महासभा
- निवडणूक काळात आतापर्यंत 16 कोटींचा मुद्देमाल जप्त
- राष्ट्रप्रतिकांचा आम्ही नव्हे, भाजपच अवमान करतेय!
- विरियातो वसाहतवादी मानसिकतेचे सराईत दुतोंडे