उत्तरप्रदेश सरकारकडून केंद्रीय गृह मंत्रालयाला प्रस्ताव
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तरप्रदेशात नाव बदलण्याची संस्कृती दीर्घकाळापासून चालत आलेली आहे. सद्यकाणतील भाजप सरकारच्या कार्यकाळात देखील अनेक शहरे आणि ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहे. राज्य सरकारने आता झाशी रेल्वेस्थानकाचे नाव बदलून ‘वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वेस्थानक’ करण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविले आहे.
प्रस्तावावर निर्धारित प्रक्रियेनुसार संबंधित यंत्रणांकडून प्रतिक्रिया मागविण्यात आली आहे. यंत्रणांच्या टिप्पणी आणि भूमिकेनंतर गृह मंत्रालय यासंबंधी निर्णय घेणार आहे. उत्तरप्रदेशात यापूर्वी मुगलसराय रेल्वेस्थानकाचे नाव बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय स्थानक करण्यात आले होते. अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज करण्यात आले आहे. तर फैजाबादचे नाव बदलून अयोध्या करण्यात आले आहे.
झाशी रेल्वे स्थानकाला ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील लढय़ाचे नेतृत्व करणाऱया राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्याची तयारी आहे. राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीची राणी असेही म्हटले जाते. अशास्थितीत रेल्वेस्थानकाला त्यांचे नाव देण्याची मागणी दीर्घकाळापासून केली जात होती.