प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात जलजीवन योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाच्या समांतर सामाजिक संस्थांकडून गावोगावी काम करुन घेण्याकरता त्यांची निवड करण्यासाठी नुकतेच त्यांचे प्रेझेंटेशन पाणी पुरवठा विभागात पार पडले. राज्य शासनाकडे हे प्रस्ताव जाणार आहेत. तेथून मंजूरी मिळणार आहे, असे सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातून गावोगावी जलजीवन योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य पातळीवरुन सामाजिक संस्थांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सातारा जिह्यातील 20 संस्थांनी आपले सादरीकरण केलेल्या कामाची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता शिंदे यांच्याकडे सादर केले. दरम्यान, त्या सामाजिक संस्थांकडून नेमके काय काम झाले त्याची माहिती घेवून पुढे शासनाच्या पाणी पुरवठा विभागात पाठवण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले.