प्रतिनिधी/ सातारा
कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकयांचे दिल्ली राजधानीच्या सीमेवर गेली 26 दिवस आंदोलन होत आहे. कडाक्याच्या थंडीतही श्रमजीवी शेतकरी न्याय हक्काच्या मागण्यांवर ठाम राहून लढत आहे. या आंदोलनात आतापर्यंत मृत्युमुखी झालेल्या शेतकऱयांना हुतात्मा व्हावे लागले ही बाब मानवतेच्या दृष्टीने काळीमा फासणारी व निंदनीय आहे. शेतकऱयांबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी व केंद्र सरकारच्या विरोधात झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे आसूड निदर्शने आंदोलने करण्यात आले.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलन करण्यात आले. यावेळी वैराट म्हणाले, शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी महाराष्ट्रातील पुरोगामी संघटनांनी उग्र आंदोलन उभे राहावे जेणेकरून शेतकयावर जुलमी दंडात्मक कारवाई होत आहे. भांडवलशाहीच्या हिताचा कायदा असल्यामुळे पोशिंदावर अन्याय होत आहे. त्याविरोधात आम्ही शेतकरी, अवजारे आणि शेतकयांच्या वेशभूषेत आंदोलन उभारून इशारा देत आहोत की, तात्काळ शेतीविषयक केलेले कायदे रद्द करून हिताचे कायदे करावेत.
तसेच कोरोनाच्या महामारीमुळे देशावरील आलेली मंदीमुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना सेवेत घेऊन सक्तीने कपात केल्यामुळे कुटुंबाची हलाखीचे दिवस आणि उपासमार झालेली असल्यामुळे आता हळूहळू कोरोना हद्दपार होत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील गमावलेल्या नोकरांना पूर्वीच्या अस्थापनावर सेवेत घेऊन पूर्ववत कायम करावे, अशीदेखील मागणी वैराट यांनी या प्रसंगी केली. बिलोली येथे हे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेवर अत्याचार करणाऱया गुन्हेगारांना नव्या शक्ती कायद्यानुसार त्यांना फाशी व्हावी, अशी मागणी देखील करण्यात आली.
या आंदोलनात काबाड कष्ट करणारे शेतकरी मजूर, अंग मेहनती कार्यकर्ते हे शेतकरी वेशभूषेत एकत्र जमून शेतकऱयांचे अवजार घेऊन पोवई नाका चौकात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भिसे, अशोक खुडे, प्रवीण सपकाळ, सनी ननावरे, सचिन वायदंडे, सागर पवार, अशोक जाधव, ऋषिकेश वायदंडे, सुनिता जाधव, महंमद शेख, सुरेखा भालेराव, निवृत्ती वैराट इत्यादी प्रमुख नेत्यांचा समावेश होता. आंदोलनात करण्यात आलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता.