प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्यातील गावांमध्ये निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी दाबोस पाणी प्रकल्पाचा दर्जा वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रकल्पाची क्षमता 25 एमएलडीपर्यंत वाढविल्यास पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे सत्तरीतील नेत्यांनी पाणी प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पाणी टंचाईमुळे सत्तरीतील अनेक गावांमध्ये सातत्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गोवा मुक्तीनंतर ते आतापर्यंत टँकरचा पडलेला वेढा सुटलेला नाही. टँकरमुक्त सत्तरी होणार तरी कधी? अशा सवाल नागरिक करत आहेत. राजकीय विरोधक हाच मुद्दा प्रामुख्याने घेऊन सतत सरकारवर टीका करतात मात्र सत्ताधारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
सुरुवातीला 5 एमएलडी क्षमतेचा पाणी प्रकल्प
माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी दाबोस पाणी प्रकल्पाचा शुभारंभ केला तेव्हा तो 5 एमएलडी क्षमतेचा होता. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कारकिर्दीत या प्रकल्पाचा दर्जा वाढवून 10 एमएलडी करण्यात आला. सध्या हा प्रकल्प 15 एमएलडी क्षमतेचा आहे.
प्रकल्पावर ताण?
सत्तरी तालुक्मयात बारा ग्रामपंचायत व एक नगरपालिका आहे. सातत्याने वाढणाऱया घरांची संख्या पाहता येणाऱया काळात पिण्याच्या पाण्याची समस्या आणखी तीव्र होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे पाणी प्रकल्पाची क्षमता वाढविणे किंवा स्वतंत्र प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. दाबोस पाणी प्रकल्पाची जागा ही प्रतापसिंह राणे यांच्या मालकीचे आहे. त्यांनी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी स्वतःची जमीन दान केलेली आहे. सदर ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा आहे. यामुळे या ठिकाणी पाण्याच्या प्रकल्पाची क्षमता वाढविल्यास तालुक्मयातील गावांमध्ये समाधानकारक पाणीपुरवठा होऊ शकतो. या प्रकल्पाची क्षमता निदान 10 एमएलडी क्षमतेने वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. तसे झाल्यास 25 एमएलडी क्षमतेचा प्रकल्प सत्तरी तालुक्मयाच्या सध्याच्या गरजेनुसार समाधानकारक करू शकतो.
सध्या दाबोस पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून नगरगाव, सावर्डे ,ठाणे वाळपई नगरपालिका, म्हाऊस, होंडा भिरोंडा काही भाग व खोतोडा आदी ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या प्रकल्पाची क्षमता वाढविल्यास निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होऊ शकते.