काँग्रेस कार्यकर्त्यांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
प्रतिनिधी/मिरज
किरकोळ स्वरूपाच्या पावसामुळे मिरज शहर परिसर आणि तालुक्यातील अनेक गावांच्या ओढ्यांना पूर येत आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी टाकळी, मल्लेवाडी आणि बोलवाड ओढ्याच्या पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले.
दोन-तीन दिवस पडलेल्या पावसामुळे ओढ्याला पूर येत आहे. शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरत आहे. ओढ्यांवरील पुलांची उंची कमी असल्याने वारंवार पुराचा धोका बळावतो. त्यामुळे या पुलांची उंची वाढवण्याची गरज असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.