मुंबई
टाटा सन्सचा 40 हजार कोटी जमवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कंपनीच्या समभागधारकांनी सदरच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या बैठकीत परवानगी दिली आहे. मंगळवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सौरभ अग्रवाल व राल्फ सेठ यांची संचालक म्हणून पुन्हा एकदा निवड करण्यात आली तर हरीष मनवादी यांची स्वतंत्र संचालकपदी निवड केली गेली.