वाळपई प्रतिनिधी :
गोवा राज्यात शुक्रवारपासून तीन दिवस टाळेबंदी लागू करण्याची घोषणा ग्राहकांनी केल्यानंतर वाळपई शहरात बाजार खरेदीसाठी आज दिवसभर मोठय़ा प्रमाणात गर्दीचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडाला. नागरिक आवश्यक वस्तू बरोबरच अनावश्यक वस्तू सुद्धा मोठय़ा प्रमाणात खरेदी करताना दिसत होते.
याबाबतची माहिती अशी की गोवा सरकारने शुक्रवारपासून रविवार पर्यंत टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात पोझीटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे .यामुळे नियंत्रण राखण्याच्या दृष्टिकोनातून टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे नागरिकात खळबळ निर्माण झाली असून आज वाळपई शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात नागरिक वेगवेगळय़ा वस्तू खरेदी करताना दिसत होते.
अनेक दुकानावर प्रचंड प्रमाणात झुंबड उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडाला असून काही दुकानात आवश्यक प्रमाणात सामाजिक अंतर राखण्यात येत होते. मात्र अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होताना दिसत होती. यामुळे सरकारने सामाजिक अंतराची अंमलबजावणी करावी अशा प्रकारचे करण्यात आलेल्या आवाहन आज दिवसभर तरी वाळपई शहरांमध्ये वार्यावरचे ठरले आहे.
महत्वाचे म्हणजे आवश्यक वस्तू खरेदी करण्याबरोबरच अनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा मोठय़ा प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते .मात्र सरकारने फक्त तीनच दिवस टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्याच्या उलट-सुलट प्रतिक्रिया सत्तरी तालुक्मयांमध्ये उमटताना दिसत आहेत. सध्यातरी करोना रोगाच्या पॉझिटिव रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली असून हा रोग आता गोव्याच्या वेगवेगळय़ा कानाकोपऱयात पोहोचू लागला आहे. यासंदर्भात टाळेबंदी यापूर्वी घेण्याची गरज होती. मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले व आता गोवा सरकारने टाळेबंदी लागू करून जनतेच्या डोळय़ात धूळफेक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिकांकडून होताना दिसत आहे.