ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
टिकरी बॉर्डरवर शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या आणखी तीन शेतकऱ्यांचा रविवारी मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 23 वर पोहचली आहे. मृतांमधील दोन शेतकरी हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील तर एक जण पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील रहिवासी होता.
हिसार जिल्ह्यातील मिर्चपूर या गावात राहणारे जोगेंद्र सिंह (वय 40) यांना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला.त्यांना तात्काळ बहादरगड येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर दुसरीकडे याच जिल्ह्यातील आदमपूर येथील रहिवासी जयवीर (47) यांचा रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
पंजाबच्या मानसा जिल्ह्याच्या धिंजर गावातील आंदोलक शेतकरी गुरमित सिंग (वय 48) यांचे रविवारी सकाळी 9.15 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.