पती आणि पत्नीच्या नात्यातला गोडवा टिकवून ठेवण्यासाठी दोघांकडूनही प्रयत्न व्हायला हवेत. आपलं नातं फुलावं, बहरावं म्हणून स्वतःमध्ये थोडेफार बदल करावे लागतात. जोडीदाराला मान देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. अर्थात हे दोन्ही बाजूंनी व्हायला हवं. पती-पत्नींमधलं नातं बळकट करण्यासाठी काय करता येईल याविषयी…
- दोघांनीही एकमेकांच्या म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायला हवं. जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. जोडीदाराला पुरेसं महत्त्व द्यायला हवं.
- दोन माणसं म्हटली की वैचारिक मतभेद असणारच. मात्र या मतभेदांचा नात्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. आपलं मत स्पष्टपणे मांडा. पण जोडीदाराच्या मताचा अनादर करू नका.
- जोडीदाराशी बोलताना योग्य शब्दांची निवड करा. सॉरी, थँक यू, प्लीज अशा शब्दांचा वापर करायला बिचकू नका. आपली चूक असेल तर सॉरी म्हणा.
- बाहेरच्या माणसांसमोर जोडीदाराचा अपमान करू नका. पाहुणे आल्यानंतर आनंदाने, प्रेमाने रहा. उगाचच वाद घालत बसू नका.
- एकमेकांना मदत करा. वैयक्तिक तसंच कौटुंबिक कामात मदत करणं आवश्यक आहे. एकमेकांना टोमणे मारू नका.त्याऐवजी चूक
समजावून सांगा.शांतपणे बोला. - एकमेकांच्या कुटुंबियांचा, प्रथापरंपरांचा मान राखा. * वाद घालणं टाळा. आपलं म्हणणं शांतपणे मांडा. जोडीदाराच्या बोलण्याचा शांतपणे विचार करा.