आमदार सामंत यांचा निर्वाणीचा इशारा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा सुसंस्कृत आहे. याठिकाणी टिका करताना टिकेचा स्तर सर्वांनी सांभाळला पाहिज़े टाळ्या मिळवण्यासाठी पातळी सोडून †िटका केल्याने काही वेळासाठी लोकांचे मनोरंजन होईल मात्र भविष्यात जिल्हय़ाचे नुकसान होईल़ यासाठी पातळी सांभाळण्याचा निर्वाणीचा इशारा आमदार उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांना दिल़ा
एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर आमदार सामंत शुक्रवारी पाली येथील निवासस्थानी दाखल झाल़े कार्यकर्त्यांनी मोठय़ा जल्लोषात त्यांचे स्वागत केल़े यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल़ी शिवसेनेच्या मेळाव्याला उत्तर देण्यासाठी नाही तर अतिवृष्टीमुळे जिल्हय़ात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आपण आल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे गटात सहभागी झाल्याचा अभिमान
शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर आपण भाजपा सोबत जाणार असे गैरसमज पसरवले जात आहेत़ आजही आपण शिवसेनेतच आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले आह़े लवकरच उद्धव ठाकरे यांच्या मनातील गैरसमज दूर होतील, असा विश्वास आह़े एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेनेचा सामान्य शाखाप्रमुख मुख्यमंत्री झाला आह़े त्यांना आपले सहकार्य लाभल्याचा अभिमान आह़े पहिल्या दिवसापासून आपली भूमिका तोडण्यापैक्षा जोडण्याची राहिल्याचे सामंत यावेळी म्हणाले.
शिवसैनिकांकडून आपल्या भूमिकेचे स्वागत
रत्नागिरीत आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व युवा सेना पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन आपली भूमिका त्यांना सांगितली आह़े अनेक खूप जुने शिवसैनिकही आम्ही घेतलेली भूमिका योग्य असल्याचे सांगत आहेत़ काही लोकांकडून मला अक्कल दाढ आली नसल्याचे सांगण्यात आल़े मला अक्कल कदाचित आली नसेल पण आपण सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवून शिंदे गटात सहभागी घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुणाला दिलेलं काढायच ही माझी संस्कृती नाह़ी
खासदार विनायक राऊत यांना आपल्याकडून दिलेले मारूती मंदीर परिसरातील कार्यालय बंद केल्याचे समजले आह़े हे कार्यालय आपण बंद करण्यास सांगितले असे गैरसमज पसरवले जात आहेत़ प्रत्यक्षात राऊत यांनी त्याच ठिकाणी काम करावे, अशी माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली आह़े कुणाला दिलेलं काढायच ही आपली संस्कृती नाही, असे सामंत यांनी सांगितले.
राणे–केसरकरांमुळे जनतेचे मनोरंजन
माजी खासदार नीलेश राणे व दीपक केसरकर यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाबाबत सामंत यांनी सांगितले की, सध्या थोडेसे गंभीर वातावरण तयार झाले आह़े अशावेळी नीलेश राणे व दीपक केसरकर यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे जनतेचे मनोरंजन होत आहे, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी व्यक्त केली.
रिफायनरी प्रकल्पाचे सर्वाकडून स्वागत
रत्नागिरी जिल्हय़ात रिफायनरी व्हावी असेच सर्व लोकप्रतिनिधींचे मत आह़े आमदार राजन साळवी, खासदार विनायक राऊत, भास्कर जाधव, शेखर निकम यांनाही याचे स्वागत केले आह़े त्यामुळे लोकांचा विरोध नसल्यास हा प्रकल्प होण्यास कोणतीही अडचण नाह़ी
थेट निवडणूकीचे स्वागत
राज्य सरकारकडून ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या थेट निवडणूका घेण्याचा आदेश जारी करण्यात आला आह़े सरकार बदलले की काही धोरणेही बदलतात . थेट निवडणूकीमुळे जनतेला आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळतो. त्यामुळे याचे स्वागतच केले पाहिज़े
घाईने निर्णय घेतल्याने विकास कामांना स्थगित़ी
मागील शासनाकडून अखेरच्या दिवसात काही निर्णय घाईने घेण्यात आले होत़े ते योग्य आहेत का हे तपासणे गरजेचे असत़े त्यामुळे जिल्हा नियोजनच्या कामाना स्थगिती देण्यात आली आह़े लवकरच ही कामे सुरू होतील.
पुढील वर्षापासून वैद्यकीय व विधी महाविद्यालय सुरू
रत्नागिरी जिल्हय़ात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून कमिटीची स्थापना करण्यात आली आह़े त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आह़े पुढील वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीत सुरू होईल़ शासकीय विधी महाविद्यालयासाठी देखील सुरू होत आहे. त्याचे प्रवेश पुढील वर्षापासून सुरू होणार आहेत, अशी माहिती सामंत यांनी पत्रकारांना दिली.