प्रतिनिधी/ बेळगाव
खानापूर रोड, टिळकवाडी परिसरातील कचऱयाची उचल करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सणात ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. कचऱयाची उचल वेळेत करून परिसर स्वच्छ ठेवण्याची तक्रार अनेकवेळा करण्यात आली. पण वाहने बंद असल्याचे कारण पुढे करून स्वच्छतेकडे कानाडोळा केला आहे. सर्वत्र भक्तिपूर्ण वातावरण असताना टिळकवाडी परिसरात मात्र दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. कोरोनासारख्या भयानक विषाणूंचा सामना करीत असताना शहराची स्वच्छता राखणे काळाची गरज आहे. पण महानगरपालिकेकडून याची दक्षता घेतली जात नसल्याने कोरोनाव्यतिरिक्त साथीच्या रोगांचा फैलाव होत आहे. काही ठिकाणी डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली असल्याचे दिसून आले आहे. शहरातील स्वच्छतेचे काम करण्यासाठी महापालिकेने निविदा काढल्या होत्या. कंत्राट पद्धतीने स्वच्छतेचे काम केले जाते. पण अलीकडे स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. काही ठिकाणी कचऱयाची उचल वेळेत केली जात नसल्याने टिळकवाडी परिसरात खानापूर रोडशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत.
कंटेनरमुक्त शहर बनविण्यासाठी घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यात येते. पण काही भागात ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात नाही. नियमितपणे कचऱयाची उचल करण्यासाठी घंटागाडी दररोज जाणे आवश्यक आहे. काही भागात दररोज कचऱयाची उचल केली जात नाही. त्यामुळे नागरिकांना घरात कचरा साठवून ठेवावा लागतो. सलग दोन-तीन दिवस कचरा वाहन येत नसल्याने कचरा घरातच कुजतो. त्यामुळे साचलेला कचरा नागरिक रस्त्याशेजारी फेकतात. काही ठिकाणी नाल्यामध्ये कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. दररोज कचरा गाडी येत नसल्याने नागरिक इतरत्र कचरा टाकत असल्याचे आढळून आले आहे. कचऱयाचे ढिगारे साचण्यास तसेच नाला व गटारी कचऱयाने तुंबण्यास महापालिकेचा आरोग्य विभाग कारणीभूत आहे. दररोज घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केल्यास कचऱयाचे ढिगारे साचण्याची समस्या निर्माण होणार नाही. पण महापालिकेचे अधिकारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. शहर व उपनगरात विशेषत: टिळकवाडी भागातील कचऱयाची उचल व्यवस्थित केली जात नसल्याने तेथील रहिवाशांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहर स्वच्छतेच्या नावाखाली कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. पण स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नाही. खर्ची घातलेला निधी वाया जात असून, स्वच्छतेच्या कामाची महापालिका आयुक्तांनी चौकशी करावी. स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.