बेळगाव / प्रतिनिधी
शहरात कचऱयाची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे सर्वत्र कचऱयाचे साम्राज्य पसरलेले आहे. कचऱयामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांची डोकेदुखी वाढलेली आहे. टिळकवाडीतील गुरुवारपेठजवळ कचऱयाची उचल न केल्याने परिसरात कचरा विखुरल्याचे निदर्शनास येत आहे.
शहराच्या अनेक भागातील कचऱयाची वेळेवर उचल करण्यात येत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी कचराकुंडी असूनदेखील कचरा बाहेर पडलेला दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी भटकी कुत्री अन्नाच्या शोधात कचराकुंडीतील कचरा विस्कटत असल्याने सर्वत्र कचरा विखुरलेला पाहायला मिळत आहे.
येथील कचऱयाची वेळेवर उचल करण्यात न आल्याने ही समस्या उद्भवली आहे. नागरिकांना येथून ये-जा करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून येथील कचऱयाची वेळेवर उचल करावी, अशी मागणी होत आहे.