प्रतिनिधी / बेळगाव
संपूर्ण शहरातील कचऱयाची वेळेवर उचल करून स्वच्छता करण्यात येत असल्याचा दावा मनपा अधिकारी करीत असतात. मात्र, हा दावा फोल ठरला असून बाजारपेठेव्यतिरिक्त कचरा उचल केली जात नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील कचऱयाकुंडय़ा स्वच्छ व उपनगरांतील रस्त्यांवर कचऱयाचे ढिगारे यामुळे रस्त्यांना कचरा डेपोचे स्वरुप आले आहे.
शहराच्या स्वच्छतेसाठी पंचवीस कोटांहून अधिक निधी खर्चूनही बाजारपेठेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी स्वच्छता ठेवण्यास मनपाच्या आरोग्य विभागाला अपयश आले आहे. कचऱयाची उचल वेळेवर केली जात असल्याचा दावा करणारे आरोग्य अधिकारी कार्यालयात बसून पाहणीदौरा करीत आहेत का, असा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
स्वच्छतेसाठी मनपाने कंत्राट दिले आहे. मात्र कंत्राटदारांकडून स्वच्छता करवून घेण्यास मनपा स्वच्छता निरीक्षक आणि आरोग्य अधिकाऱयांना अपयश आले आहे. यामुळे उपनगरांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण आहे. शहरात रोगराईचा फैलाव होत असल्यामुळे स्वच्छतेचे आवाहन मनपावतीने करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचऱयाची उचल करून स्वच्छता राखण्यात मनपा अपयशी ठरली आहे. यामुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण’ अशी अवस्था मनपाची झाली आहे. कचऱयाची उचल वेळेवर करण्याची सूचना आयुक्तांनी केली होती. पण कंत्राटदारांनी कानाडोळा केल्याने अस्वच्छता पसरली आहे.
माती-शेणाच्या ढिगाऱयांनी रस्ता बंद
टिळकवाडी परिसर स्वच्छ आणि उच्चभ्रू वस्तीचा असल्याचे सांगण्यात येते. पण शुक्रवार पेठेमधून गुरुवार पेठेकडे जाणाऱया कॉर्नरवर मातीचे आणि शेणाचे ढिगारे आहेत. यामुळे रस्ता पूर्णतः बंद झाला आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असून ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नानावाडी, आगरकर रोड, व्हॅक्सिन डेपो परिसरातील रस्त्यांशेजारी आणि भंगीबोळ कचराकुंडय़ा बनल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला ठेवलेले कंटेनर कचऱयाने भरून वाहत आहेत. कचऱयाची उचल करून जंतुनाशक पावडर फवारणे आवश्यक आहे. कचरा टाकण्यात येणाऱया परिसरात पावडर टाकण्यात येत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. वाऱयामुळे प्लास्टिक पिशव्यांचा कचरा सर्वत्र पसरत आहे. महापालिकेच्या अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.