प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी पोलीस स्थानकाच्यावतीने अनगोळ मृत्यूंजयनगर, स्वामी विवेकानंद रोड, अनगोळ मुख्य रस्ता येथील नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाने मदतीसाठी जाहीर केलेल्या 112 क्रमांकाबद्दल माहिती देऊन जनजागृती केली. टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, शहरातील तसेच टिळकवाडी पोलीस ठाण्यातील हद्दीत कोणताही अनुचित प्रकार, घटना घडल्यास, एखाद्या व्यक्तीबद्दल संशय निर्माण झाल्यास, एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास किंवा महिला-मुलींची कोणी छेड, चोरी, सोनसाखळी चोर, दरोडेखोर किंवा इतर कोणतीही घटना घडल्यास या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
112 क्रमांकावर नागरिकांनी एखाद्या गुन्हय़ासंदर्भात तक्रार केली किंवा गुन्हेगाराबद्दल माहिती दिल्यास त्यांच्या नावाबाबत गुप्तता पाळण्यात येईल. त्यामुळे कोणालाही तक्रार केलेल्या व्यक्तीचे नाव किंवा इतर माहिती देण्यात येणार नाही. त्यामुळे कोणीही तक्रार करण्यास घाबरू नये, असे सांगत त्यांनी तक्रार करण्यास नागरिकांनी पुढे यावे, असे सांगितले. यावेळी नागरिकांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या. स्वामी विवेकानंद रोड, मृत्यूंजयनगर, चिदंबरनगर आदी भागात गतिरोधक बसविण्याची मागणी केली. रस्ते चांगले झाल्यामुळे वाहनचालक आपली वाहने वेगाने चालवत आहेत. त्यामुळे वृद्ध, शाळकरी मुले, महिला व नागरिकांना रस्ता ओलांडताना त्रास होत आहे. यावेळी लहान-मोठे अपघातही घडत आहेत. याचबरोबर दोन रस्ते एकत्र मिळतात त्या ठिकाणी अपघात घडण्याची शक्मयता आहे. तेव्हा दोन्ही रस्त्यांवर गतिरोधक बसविणे महत्त्वाचे आहे, असे सांगण्यात आले. यावेळी किशोर गजगेश्वर यांनी सूत्रसंचालन केले. अरुण गावडे यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तसेच टिळकवाडी पोलीस ठाण्यातील बीट प्रमुख श्रीदेवी टोटगी, यशोदा सूर्यवंशी, व्ही. चिन्नस्वामी, हवालदार बानी, रमेश माने, मिलिंद अर्जुनवाडकर, श्रीनिवास हुद्दार, विश्वास पवार, शिवानंद दुर्गन्नावर, दिनेश आनंदाचे, अभिषेक पाटील, राजू गोडसे, सिद्धार्थ पाटील, सुमन पाटील, बिटू अर्जुनवाडकर, अभिषेक माईनकटी, अनिल बांदेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.