प्रतिनिधी/ रत्नािगरी
भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काळ्य़ा पाण्याची शिक्षा भोगलेले, गणेशोत्सव-शिवजयंतीसारख्या सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीला गतिमान करणारे, ‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य टिळक यांच्या रत्नागिरी येथील जन्मस्थानाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रत्नागिरीत ’उर्दू भवना’ऐवजी लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रीय स्मारक निर्मिण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण प्रांत व गुजरात राज्य समन्वयक मनोज खाडय़े यांनी पत्रकार परिषदेत केली. याविषयी हिंदु जनजागृती समिती जनआंदोलन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेला शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह राकेश नलावडे, अपरांतचे दीपक जोशी, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक संजय जोशी आदी उपस्थित होते. खाडय़े पुढे म्हणाले की, दुदैवाने भारतात गांधी-नेहरु आदी ठराविक व्यक्तिमत्त्वांचे उदात्तीकरण केले जाते, मात्र अन्य राष्ट्रपुरुष व क्रांतीकारकांची उपेक्षा होताना आढळते. टिळक जन्मस्थान राज्य शासनाच्या पुरातत्व विभाग, रत्नागिरीच्या अंतर्गत येते. या जन्मस्थानाची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आह़े टिळकांच्या घरावरील छपराची कौले फुटली आहेत. भिंतींवर शेवाळ धरले असून काही ठिकाणी भिंतीला तडे गेले आहेत. पुरातत्व खात्याने जन्मस्थानाच्या प्रवेशद्वाराबाहेर लावलेला फलक गंजला असून तो नीट वाचताही येत नाही, अशा अवस्थेत आहे. लोकमान्य टिळकांचा पुतळा व मेघडंबरीची दुरवस्था झाली असून पुतळ्य़ाचा रंगही काही ठिकाणी उडाला आहे. स्मारकाच्या छपराच्या कौलांवर गवत वाढले आहे. याकडे जर वेळीच लक्ष दिले नाही तर पावसाळ्यात ही ऐतिहासिक वास्तू आणि वास्तूत जतन केलेला अनमोल ठेवा खराब होण्याची शक्यता आहे. मेघडंबरीच्या खाबांना लावलेल्या फरशांमध्ये भेगा पडल्या आहेत. मेघडंबरीवरील अर्धगोलाकार छताचा रंग उडाला आहे. मेघडंबरीच्या उद्घाटनाचा फलक खराब झाला असून तो नीट वाचता येत नाही. मेघडंबरीच्या मागे लो. टिळकांची शिल्पाकृती तुटलेल्या स्थितीत आहे.
या स्मारकाला भेट द्यायला देशभरातून शेकडो पर्यटक, शाळांच्या सहली येतात. ते स्मारकाची माहिती पुस्तिका मागतात, मात्र स्मारकाच्या ठिकाणी साधी माहिती पुस्तिकाही नाही. पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, ‘सीसीटीव्ही’ नाही, वाहनतळाची व्यवस्था नाही. यासह अनेक आवश्यक गोष्टींचा इथे अभाव आहे.
पर्यटकांना सध्या मोडलेले-तुटलेले व भग्नावस्थेतील जन्मस्थान पहावे लागत आहे, यापेक्षा दुर्दैव ते काय, इतकी दुरवस्था होईपर्यंत पुरातत्व खाते झोपले आहे काय, असा प्रश्न खाडय़े यांनी विचारल़ा या स्मारकाची राज्य अथवा केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाने पहाणी केली का, असे माहिती अधिकारात विचारले असता ‘नाही.’ असे आलेले उत्तर पुरातत्व खात्याची या स्मारकाप्रतीची अनास्थाच दर्शवते. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाचे त्वरित संरक्षण व संवर्धन करण्यात यावे, ते ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे. येथे लो. टिळकांचा जीवनपट दाखवण्याची व्यवस्था करावी. जन्मस्थानाची माहिती पुस्तिका व लोकमान्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या प्रती, लो. टिळकांची दुर्मीळ छायाचित्रे इत्यादी साहित्य येथे ठेवण्यात यावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनी केली आह़े
जनआंदोलन मुंबई, पुणे येथेही करणार
सुशोभिकरणासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेला साडेचार कोटीचा निधी कुठे गेला, असा सवालही मनोज खाडय़े यांनी यावेळी उपस्थित केल़ा टिळक स्मारकाच्या झालेल्या दुर्दशेबाबत जनआंदोलन छेडण्यात येणार असून ाव्टिटरपासून सर्व समाजमाध्यमांद्वारे हे जनआंदोलन उभारण्यात येणार आह़े त्यानंतर हे आंदोलन मुंबई व पुणे येथेही हेणार असल्याचे खाडय़े म्हणाल़े