प्रतिनिधी/ रत्नागिरी
टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मिळणाऱया प्रमाणपत्राची मुदत 5 वर्षावरून पुढे 7 वर्षे एवढी ठेवली आहे. मात्र वेळकाढू व निक्रिय शासनाच्या उदासीन धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. परीक्षा पास झाल्याच्या 7 वर्षानंतर हे प्रमाणपत्र अवैध ठरते. त्यानुसार 2013 मध्ये राज्याच्या पहिल्या टीईटीत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्राची वैधता 13 जानेवारी 2021 रोजी संपणार आहे. येत्या 2 महिन्यांत शिक्षकाची नोकरीची संधी न मिळणाऱया राज्यातील हजारो उमेदवारांची मेहनत वाया जाऊन ते शिक्षकपदासाठी बाद ठरणार आहेत.
2013 मधील टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण उमेदवारांची वैधता येत्या जानेवारीत संपणार असल्याने हे उमेदवार चिंतेत सापडले आहेत. यातील 2014 ते 2019 मधील उत्तीर्ण उमेदवार वगळता शिक्षक भरती रखडल्याच्या कारणामुळे 2013 च्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या मेहनतीवर पाणी फिरल्यात जमा आहे. शिक्षक होण्यासाठी टीईटी बंधनकारक करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषदेने (एनसीटीई) 2011 मध्ये या बाबत परिपत्रक काढल्यानंतर राज्यात 15 डिसेंबर 2013 मध्ये पहिली टीईटी घेतली होती. शासनाचे शिक्षक भरतीचे घोडे गेली कित्येक वर्षे अडले आहे. एका बाजूला शिक्षक भरती नाही तर दुसऱया बाजूला शिक्षक पात्रतेसाठी आवश्यक टीईटी परीक्षा मात्र दरवर्षी घेतली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार टीईटी देतात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मिळणाऱया या प्रमाणपत्राची मुदत 5 वर्षावरून पुढे 7 वर्षे एवढी ठेवली आहे. मात्र वेळकाढू शासन धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे.
शिक्षण शास्त्रातील पदवी किंवा पदविका घेतलेल्या लाखो उमेदवारांनी टीईटी दिली. शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) 2013 मध्ये उत्तीर्ण झालेल्या 31 हजार उमेदवारांपैकी अपवाद वगळता बहुतेकांची मेहनत अजून 2 महिन्यांत वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियमानुसार या उमेदवारांची टीईटीची वैधता जानेवारीत संपणार आहे. दरवर्षी उमेदवारांची भर राज्यात 2016 हे वर्ष वगळता 2013 पासून 2018 पर्यंत दरवर्षी टीईटी झाली. या कालावधीत राज्यात 69 हजार 706 उमेदवार पात्र ठरले आहेत. पुढील जानेवारीपासून (2021) दरवर्षी पात्रता प्रमाणपत्राची वैधता संपलेल्या उमेदवारांची भर पडत जाणार आहे. केंद्राची टीईटी 2011 मध्ये सुरू झाली. त्यानुसार 2011 व 2012 मध्ये केंद्राची टीईटी दिलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्राची वैधता संपुष्टात आली आहे. त्यामुळे वैधता रद्द करावी व शिक्षक भरती करावी, अशी मागणी आता या टीईटी परीक्षा दिलेल्या उमेदवारांतून केली जात आहे.
बॉक्स करणे…..
शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातली. तरीही टीईटीचे आयोजन केल्यावर शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका घेतलेल्या लाखो उमेदवारांनी टीईटी दिली. @2013 मध्ये राज्यात 6 लाख उमेदवारांनी दिली परीक्षा.
@त्यापैकी 31 हजार 72 उमेदवार ठरले पात्र.
@गेल्या 7 वर्षात नोकऱया मिळालेल्यांची संख्या अत्यल्प.
@परीक्षेनंतर भरती होण्याची आशा ठरली फोल.
@मात्र परीक्षेच्या शिकवण्या व प्रश्नसंच बाजारपेठ उभी राहिली.
@परीक्षा तयारीसाठी मोजलेले हजारोंचे शुल्क व मेहनत वाया गेली.