नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला अजूनही कोरोना समजलेला नाही, असे बोलत आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी आणि केंद्र सरकावर टीका केली. राहुल गांधींना प्रत्यत्तर देण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी टूलकिट प्रकरणावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आता पुराव्याची गरज नाही, टुलकिट काँग्रेसचे षडयंत्र असल्याचे सिद्ध झाले, असे जावडेकर म्हणाले.
प्रकाश जावडेकर म्हणाले की, आज लसीकरण होत नाही असा सवाल उपस्थितीत केला. पण लसीकरण होत आहे. मात्र आजचे तुमचे विधान ऐकून हे निश्चित झाले की, आता पुराव्याची गरज नाही. टुलकिटची निर्मिती तुमचीच असल्याचे सिद्ध झाले. कारण ज्याप्रकारची भाषा, ज्याप्रकारचे तर्क, ज्याप्रकारे आपण लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा आणि भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्यांच्या रणनीतिचा भाग आहे. देशात तयार झालेल्या आणि परदेशातून येणाऱ्या आलेल्या लसींच्या माध्यमातून या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत सगळ्या देशाचं लसीकरण पूर्ण झालेलं असणार आहे.
जावडेकर पुढे म्हणाले की, हुल गांधी यांनी देशाला उपदेश देण्याऐवजी राजस्थान आणि आपल्या राज्यांकडे पाहा. देशाला विश्वास आहे, डिसेंबरपर्यंत १०० कोटींहून जास्त लोकांचे लसीकरण पूर्ण होईल.
भारत व्हॅक्सिन कॅपिटल असूनही या देशातील लसी पंतप्रधान मोदींनी निर्यात केल्या आणि इथल्या लोकांना वाऱ्यावर सोडलं. आता पंतप्रधानांनी व्हॅक्सिन स्ट्रॅटेजी बनवून कोरोनाच्या लसीकरणाचा वेग वाढवावा अन्यथा देशात तिसरी, चौथी नव्हे तर कोरोनाच्या अनेक लाटा येतील, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते.