नवी दिल्ली
तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱय टेक महिंद्राने आगामी काळात भरती प्रक्रियेचे आयोजन केले असून याअंतर्गत 600 जणांची भरती केली जाणार असल्याचे समजते. जुलै 2022 पर्यंत 600 अभियंत्यांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीने सध्या भुवनेश्वर येथील केंद्राच्या विस्ताराचा विचार चालवला आहे. भरतीत 300 जणांची निवड कॅम्पस मुलाखतीतून (प्रेशर्स) केली जाणार आहे.