नवी दिल्ली : भारताची आंतरराष्ट्रीय दर्जाची अव्वल महिला बॅडमिंटनपटू तसेच 2016 रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधू जुलै महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिम्पिक पथसंचलनात भारताची प्रमुख ध्वजधारक असेल, असे संकेत आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱया भारतीय क्रीडा पथकातील एक पुरुष आणि एक महिला ऍथलिट भारतीय तिरंगा ध्वजासह पथसंचलनात राहतील, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक समितीच्या प्रवक्त्याने दिली. पुरुष गटात नीरज चोप्रा, शरथ कमल, बजरंग पुनिया, अमित पांगल यापैकी एका ऍथलिटला निवडले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन समारंभ 23 जुलैला होणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या खेळाडूकडे ध्वज ठेवावा यासाठी कोणताही नियम नाही. मात्र, मागील ऑलिम्पिक पदक विजेत्या ऍथलिटला पथसंचलनात हा सन्मान दिला जातो. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधू आणि साक्षी मलिक यांनी पदके मिळविली होती.
Previous Articleछोटय़ांचं मोठं स्वप्न सा रे ग म प लिटील चॅम्प
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.