साहित्यः
5 ते 6 मोठे टोमॅटो, 3 कांदे, 10 ते 12 काजू, 7 ते 8 लसूण पाकळय़ा, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 चमचे तेल, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धणे-जिरेपूड, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा हळद पावडर
कृतीः
टोमॅटो चिरून मिक्सरला लावून त्याची प्युरी बनवून घ्यावी. काजू थोडय़ाशा गरम पाण्यात अर्धा तास भिजत घालावेत. नंतर मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. कांदे बारीक चिरून घ्यावेत. आता चिरलेला कांदा, चिरलेल्या लसूण पाकळय़ा, किसलेलं आलं गरम तेलात लालसर रंगावर परतवून घ्यावे. नंतर त्यात गरम मसाला पावडर, धणे-जिरेपूड, लाल तिखट पावडर आणि हळद टाकून मंद आचेवर परतवून घ्यावे. आता त्यात टोमॅटो प्युरी घालून पुन्हा तेल सुटेपर्यंत परतवावे. शेवटी त्यात काजू पेस्ट घालावी. आता आच बंद करून त्यात मीठ घालून मिश्रण मिक्स करावे. तयार मसाला ग्रेव्ही कधीही वापरू शकता.