जागतिक स्तरावर 15 टक्के कपात – चिपच्या टंचाईचा परिणाम
वृत्तसंस्था/ बेंगळूर
वाहन उद्योगातील कंपनी टोयोटा मोटर कॉर्प जागतिक स्तरावर आगामी काळात कार उत्पादनात घट करणार असल्याचे सांगितले जाते. वाहनांकरीता लागणाऱया सुटय़ा भागांच्या अपुऱया पुरवठय़ाखातर सदरचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
आगामी पुढच्या म्हणजेच नोव्हेंबरमध्ये कंपनीने वाहन उत्पादनात 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचे उत्पादन कमी करण्यामागे चिपची टंचाई हेच सांगितले जात आहे. जपानमधील ही सर्वात आघाडीवरची कार उत्पादन करणारी कंपनी आहे. नोव्हेंबरमध्ये कंपनी 1 लाख ते दीड लाख इतक्याच मोटारींचे उत्पादन घेणार आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात मोटारीसाठीच्या सुटय़ा भागांचा पुरवठा अनियमित राहिल्याने कंपनीच्या मलेशिया आणि व्हिएतनाम येथील कारखान्यातील उत्पादन घटवण्यात आले आहे.