नवी दिल्ली :
ऑटो क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी टोयोटा मोटर कॉर्पने भारतात आता विस्ताराची योजना राबवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारतात आकारल्या जाणाऱया जास्त करामुळे टोयोटाने हा निर्णय घेतला आहे. कार व मोटारसायकलवर सरकारने कर जास्त आकारला असल्याने ग्राहकांकडून मागणी कमी होते आहे, असे कंपनीने म्हटले आहे. 1997 मध्ये भारतात कार्यरत असणाऱया या कंपनीत जपानच्या कंपनीचा 89 टक्के इतका वाटा आहे. दुचाकी, कारवर 28 टक्के इतका कर लादला जातो त्याशिवाय अतिरीक्त खर्चही येत असल्याने उत्पादन प्रक्रियेवर याचा परिणाम होत असल्याचे कंपनीने सांगितले. करामुळे ग्राहक कार खरेदी करत नाहीत असाही आरोप कंपनीने केला आहे.