वार्ताहर/ पाली
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील नाणिज येथे ताबा सुटलेल्या ट्रकने एसटी एसटी बसला धडक दिल़ी सोमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडल़ी अपघातात बसमधील 11 प्रवासी जखमी झाल़े या अपघातामुळे दोन्ही वाहने रस्त्यावरच उलटल्याने महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातातील जखमींना नजीकच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल़े
रत्नागिरीच्या दिशेने येणारा मालवाहू ट्रक (एमएच 13 -सीयू 4575) च्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल़ा ट्रकने रस्त्याच्या विरुद्ध बाजूस येऊन कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱया रत्नागिरी – लातूर एस्टी बस (क्र. एमएच20 बीएल 1254) ला समोरुन धडक दिल़ी
अपघातग्रस्त एस्टी. बसमधील जखमी प्रवाशांना महामार्गावरून प्रवास करणारे रत्नगिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, मोहन गोताड, सिद्धेश दळी व नाणीज, पाली परिसरातील नागरीकांनी बाहेर काढले. एस्टी बसमधून प्रवास करणारे प्रवासी विलास भरत कोरे (18 रा. गिरग्याल ता. जत, जि. सांगली), हे गंभीर जखमी आहेत. या अपघातामध्ये संदीप सज्जन लांडे (29 एस्टी चालक रत्नागिरी), बाळासाहेब जालींधर तांदळे (37 वाहक), हरिश पुष्कराज छाँछी (25 रा. खंडाळा), विजय अनंत जाधव (58 रा.तेलीआळी रत्नागिरी), आदिनाथ सुरेश पवार (19 रा.खंडाळा), शकुर अहमद बोंबल (60 रा. अभूदय नगर रत्नागिरी), राजाराम नेमू गडीवाल (60 रा. शिराळा), श्रीसहील उरप्पा तेलसंग (50 शिराळा), रामचंद्र महादेव कामतेकर (54 रा. पाली), भोला पंडीत ( 39 रा. कोल्हापूर) सर्वेश दिगंबर कडगावे (19 रा. रत्नागिरी) एम रंगनाथ (51 रा. कोल्हापूर) हे जखमी झाले आहेत. या जखमींवर प्रथमोपचार पाली ग्रामीण रुग्णालय येथे करुन अधिक उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आले.
या अपघाताची खबर पाली पोलीस दूरक्षेत्रात एस.टी. चालक संदीप लांडे यांनी दिली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या अपघातानंतर घटनास्थळावरुन ट्रक चालक पळून गेला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी हातखंबाच्या वाहतूक पोलीस कर्मचाऱयांनी येऊन तात्काळ सुरळीत केली. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित चिले हे करत आहेत.
अपघातग्रस्त ठिकाण ः तातडीच उपाय योजना आवश्यक
नाणीज इरमलवाडी रामभाऊ वळणावर गेल्या काही महिन्यात चार अपघात झाले. या अपघतात दोन मयत तर काही जखमी झाले आहेत. त्यामुळे या अपघातग्रस्त खखठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील ग्रामस्थांसह वाहनचालकांतून व्यक्त होत आहे.