टोलनाक्यावरील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर / वृत्तसंस्था
काश्मीरमधील नगरोटा येथील बान टोलनाक्मयाजवळ ट्रकमधून घुसखोरी करणारे दहशतवादी आणि जवानांमध्ये गुरुवारी जोरदार चकमक झाली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या संघर्षात चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. या चकमकीनंतर जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला असून संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
टोलनाक्यावर बुधवारी मध्यरात्रीपासून वाहनांची कडक तपासणी केली जात होती. तपासणीदरम्यान एका ट्रकला अडवल्यानंतर चालकाच्या चौकशीवेळी त्याने दिलेली माहिती संशयास्पद वाटल्याने ट्रकची तपासणी करण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली. यानंतर ट्रकची तपासणी सुरू असताना, पोलीस व सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. यानंतर जवानांकडून प्रत्युत्तर देण्यास सुरूवात झाली. हळूहळू अन्य कुमक देखील मागवली गेली. तसेच लष्करी जवानांनाही पाचारण करण्यात आले. जवळपास 3 तास जोरदार चकमक सुरू होती. ज्यामध्ये दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणावर जवानांवर गोळीबार केला गेला. या हल्ल्यात दोन पोलीस शिपाई जखमी झाले आहेत. कारवाईनंतर घटनास्थळावरून 11 एके-47 रायफल, तीन पिस्तुल्स, 29 ग्रेनेड, मोबाईलसह अन्य शस्त्रसामुग्री जप्त करण्यात आली.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवानांनी नगरोटा भागात जागोजागी बंदोबस्त ठेवला होता. वाहनांची तपासणी केली जात असतानाच, ट्रकमधून आलेले दहशतवादी जंगलाकडे पळू लागले. यावेळी जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. सदर दहशतवादी ट्रकद्वारे जम्मू-श्रीनगर मार्गाने काश्मीरला जात होते. याच दरम्यान टोल नाक्मयावर सुरू असलेली वाहनांची तपासणी पाहून ते जंगलात पळ काढत असतानाच, चकमक सुरू झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत या भागात पूर्णपणे तणावाचे वातावरण होते. जवानांकडून सर्व वाहनांची कसून तपासणी सुरू होती.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा हल्ल्याचा कट
चकमकीनंतर दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. आगामी काळात जम्मू-काश्मीरमधील डीडीसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, अशी माहिती जम्मू विभागाचे पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले. टोलनाक्मयावर झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मागील काही दिवसांत डीडीसी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून हल्ल्याचा कट शिजत असल्याची माहिती आम्हाला गुप्तचर विभागाकडून प्राप्त झाली होती. निवडणूक काळात दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्मयता वर्तवली जात होती. तसेच दहशतवादी मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा घेऊन घुसखोरी करणार असल्याची माहितीही मिळाली होती. त्यानुसार योग्य नियोजनाद्वारे फार मोठा कट उधळल्याचा दावा सिंह यांनी केला आहे.